नवीन लेखन...

एक आठवण – शांतिनिकेतनची

मी 1977 ला  इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत  नोकरी करण्यासाठी  राणीगंज जवळच्या  परसिआ  या  खाणीत 18.1.1977 ला  जॉईन झालो.तो  दिवस मला  महत्वाचा  वाटला  होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे  कमवू देऊ शकणारी  पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी  सोडून मी  इतक्या  दूर बंगालमध्यें आलो होतो. […]

मातीचा देह मातीला शरण गेला

आजी आजोबा होते थकलेले थकलेल्या वाड्यात रहात होते. काळाने केला भयानक घात सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात पण पडताना वाड्याने हात टेकले आजी आजोबांना त्याने वाचविले जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले आजी मात्र एकटीच राहिली धीराने वाडा नाही सोडला तिनं हट्टाने म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं या तूम्ही सारी असेच दर […]

नव्या वाटा

सध्या बरेच पालक आपल्या मुलास किंवा मुलीस ते मुल ५ / ६ वर्षाचे असतानाच गायन, वादन, नृत्य अशा कोणत्या तरी कलेचे शिक्षण घेण्यासाठी क्लास लावतात. सर्वच मुलांना त्यांची आवड असते असेही नाही. काहींना जन्मजात देणगी असते अशी मुले योग्य मार्गदर्शन व परिश्रम घेतल्यास उत्तम कलाकार बनतात. शरयू दाते हे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. […]

मतांची पोतडी सत्तेची गोधडी : प्रथम अंक

ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला वाटप-रांगेत धरी जोर चांगला लांगुलचालन करून जोड सांधला संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला अखेरीस कँडिडेट-टिळा लागला धुंदीला नच पारावार राहिला प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला पक्षानें आज खरा पांग फेडला.               १   ‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला ‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला खांद्यावर […]

असाही एक प्रवास

आपण अनेक मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतंय याची मलाही जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या की आज जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे. […]

मनातला कृष्ण…. 

अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यास तो बिचकला मनातल्या अर्जुनाला कृष्ण अजुनही नाही भेटला उगाच खोट्या धर्मापायी निरपराध कोणी मारला अश्वत्थाम्याची ती जखम पुन्हा लागली भळभळायला जाणुन बुजून पाप करून त्यांना पश्चाताप नाही झाला त्यांच्यातला कपटी दुर्योधन आज पुन्हा मोठ्याने हसला शकुनीच्या मनातलं कपट ओळखू नाही शकला मनातला धर्मराज आज मला पुन्हा हतबल दिसला अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यास तो घाबरला […]

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांचीज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपतपडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणाराआपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे, या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे ? पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी ? काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी ? याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो ? कोण आहोत ? याचे जरा सुध्दा भानराहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे.  तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हेआपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमानजागृत होत नाही.    युवास्सत: साधु युवाध्यापक: ।     आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥ उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे. युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल. बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो.  याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही  पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते. म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे. परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान ! — सुनिल कनले 

गुंतता नयन हे

सांगते मी गुपीत तुला रे सांगू नको तू कुणाकडे नजरेत तुझ्या गुंतता नजर का पाहू मी या जगाकडे । एक शब्द मज  एक ध्यास अशी नजरेत नजर राहू दे जन्मोजन्मी साथ सजणा सदैव अशीच राहू दे । हात तव मज हाती असता अन नजरेत माझ्या नजर तुझी भासते मज जग जिंकीले मी असता मजला साथ तुझी […]

1 19 20 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..