कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळून जाते. मी असा सुखद अनुभव अनेक वेळा घेतला आहे. त्यातलाच एक अनुभव सांगतो. एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो होतो. दुपार रिकामी होती. सहजच संगीतकार आनंद मोडकांना फोन केला. त्यांच्यामुळेच ‘प्रभू-मोरे’ ही हिंदी भजनांची कॅसेट कशी बनली ते यापूर्वीच सांगितले आहे. पण त्यांच्याबरोबर मी कोणतेच […]
“काका आपल्या खाद्य विशेषांकाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. अजूनही तुम्ही त्या मॅडम बुदिमाला रॅगदे यांची मुलाखत घेतली नाही? कधी घेणार आहात?’ सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख मुलाखत विशारद काका सरधोपट यांना विचारीत होते.” “साहेब, त्या अमेरिकेला गेल्या आहेत. उद्या येतील. मी उद्याचीच वेळ घेतली आहे. उद्या मुलाखत […]
मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर […]
वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. मोहिनी वर्दे यांनी लिहिलेला हा लेख रस्त्यावर पडलेला रूमाल त्या दिवशी मी सहज उचलला चार बाजूंनी लेस विणलेली कोपऱ्यात दोन पक्षी एकमेकांच्या चोचीत चोच घालून;… एक आवंढा गिळला. कुठे गेले ते दिवस? तो रोमान्स? स्वप्नांच्या थरकत्या पुलावरुन पैलतीर गाठण्याचा दिवस कोणाकोणाच्या आयुष्यात येतो? त्यांच्या? माझ्या? तसं पाहिलं तर जीवनात […]
प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या दोघांमध्ये नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला प्रतिसाद देत असतो. […]
भिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते. त्यांच्यासाठी मी अनेक कार्यक्रम केले होते. एक दिवस प्रकाशमामा धामणकरांचा फोन आला. त्यांचे वडील भिवंडीचे माजी खासदार कै. भाऊसाहेब धामणकर याच्या पुतळ्याचे अनावरण करायचे होते. त्यासाठी एका समारंभाचे आयोजन ते करीत होते. माननीय नेते […]
विजयला प्रवासात कोणत्याही वाहनात प्रवास संपेपर्यंत झोप येत नाही. यावेळी डुलकी येत होती कारण त्याने उलटी न होण्याची गोळी अगोदरच घेतली होती. विजय प्रवासादरम्यान शक्यतो काही खात नाही पण यावेळी मात्र प्रचंड भूक लागल्यामुळे त्याने चहा बिस्कीट खाल्ला. विजयला व्यक्तीश: रात्रीचा प्रवास आवडत नाही कारण रात्रीच्या प्रवासात बाहेरचे नजरे पाहायला मिळत नाही. विजयला कोकणातील निसर्ग पाहायला […]
पंचबद्रीमधील शेवटचे स्थान म्हणजे भविष्यबद्री. जोशीमठापासून १७ कि.मी. अंतरावर मलारी रस्त्यावर ‘सुबैन’ या गावी भविष्यबद्रीचे मंदिर पर्वतराजीत दडले आहे. लोककथेनुसार जोशीमठाच्या नृसिंह मंदिरातील नृसिंह मूर्तीचा कृश होत जाणारा डावा हात गळून पडेल. त्यावेळी नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळतील व विशालबद्रीची वाट कायमची बंद होईल. तेव्हापासून भविष्यबद्रीलाच बद्रीनाथचे स्थान समजले जाईल. जोशीमठहून मलारी रस्त्यावर हे स्थान आहे. जोशीमठपासून […]