नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग

भली मोठी वैचारिक पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये अर्जुनास समजावली… 1)ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील.. 2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील.. 3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!! […]

मराठा मोर्चा

मराठा मोर्चा सर्व महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, होणारच, कारण ज्यांच्या मताने गेली चार पाच दशके मराठा सरपंचा पासून मराठा मुख्यमंत्री या राज्याच्या सिंहासनावर बसून शासन करत होते, ते सर्व आज पूर्ण मराठा समाजाला, वेठबिगारी बनवून सत्तेसोबत मालमत्तेची मलई आपल्या ताटात ओढून या अभागी जनतेला देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य उघड झाले. हे असे […]

झटपट आनंद – तात्पुरत्या सुखासाठी…

“झटपट आनंद – तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील होणारा तोटा स्वीकारणे.” एखाद्याला डॉक्टरांनी सांगितले असते कि अंडी मटण एकदम बंद- बाहेरचं खाणं बंद फक्त साधे जेवण वेळच्या वेळी खा. ते पटलेलं असते, परंतु कुठूनतरी मिसळपावचा किंवा चायनीजचा वास येतो किंवा मित्रांच पार्टिचे नियोजन सुरु होतं. मग काय डॉक्टरांनी सांगितलेल हळूच बाजूला पडते नी आपोआपच पार्टीला हजेरी लागते. मग […]

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत […]

नात्यांची मिसळ

व्हॉटसऍपवरुन आलेली ही कविता. तिचा कवी माहित नाही पण कविता सुंदर आहे म्हणून शेअर केलेय.. […]

फक्त एक गंमत…

कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला…. कर्‍हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी….. देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत……… (मेसेज गंमत म्हणूनच घ्यावा.) — विनय

असं असावं.. असं असावं..

मतपेटी ‘रिकामी’ असूनही लोकप्रिय असावं “राज ठाकरे” सारखं….! तोंडुन निघालेल्या प्रत्येक शब्दावर ठाम रहावं “बाळासाहेब ठाकरें” सारखं…. लोकांच्या अपेक्षा उंच कराव्या “नरेंद्र मोदीं” सारख्या… ३५ वर्षात जे कमावलं ते ‘एका’ वर्षात गमवावं “नारायण राणे” सारखं..! मैत्रीच्या नावाखाली धंदा करावा “बराक ओबामा” सारखा..! भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे “शरद पवार” […]

देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला…

१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे. २. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे. ३. मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा […]

1 26 27 28 29 30 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..