नवीन लेखन...

नात्यांची मिसळ

व्हॉटसऍपवरुन आलेली ही कविता. तिचा कवी माहित नाही पण कविता सुंदर आहे म्हणून शेअर केलेय.. 

आयुष्य म्हणजे नात्यांची मिसळ
आई वडील मूग मटकी कडधान्य
त्यांच्या शिवाय मिसळ ही कल्पनाच अमान्य
त्यांच्या मुळेच तर ती बनते सकस अन्न

बहीण भाऊ टोमॅटो बटाटे वाटाणे
मिसळतील एकमेकात सहजपणे
मिळून येईल मिसळ
मग छान दाटपणे

नातेवाईक म्हणजे
मीठ लिंबू मसाला
चव हवी मस्त तर
प्रमाणातच घाला
खारट आंबट मिसळ
उगाच हवी कशाला

मित्र मैत्रिणी म्हणजे
लाल मस्त तर्री
मिसळीला रसदार
तीच करते खरी
हवीहवीशी चटकदार
चव आणते भारी

जोडीदार कांदा
डोळ्यात आणे पाणी
पण मिसळीला मजाही
तोच तर आणी
फोडणीत हवाच शिवाय
वरून त्याची पेरणी

मुलं कुरकुरीत शेव
फरसाण चिवडा
त्यांच्यावीना मिसळ
हा विचारच सोडा
अधुरा राहील ना सारा
खटाटोप एवढा

शेजारी म्हणजे कोथिंबीर
हिरवी गार
असेल तर
मिसळीची वाढेल शोभा पार
नसली तरी काही
अडणार नाही फार

ऑफिस बॅास म्हणजे मलईदार दही
गोड असेल तरच
मिसळीला सही
नाहीतर ठेवा दूरच
घालू नका काही

मिसळ जमली चविष्ट तर
रंगत हमखास
पण सर्वांच्याच नशिबी,
नाती नसतात ना झकास
मग आयुष्यच सारे
होऊन जाते उदास

पण बिघडली चव तरी
प्रयत्न नाही सोडायचे
चवीनुसार पदार्थ
कमी जास्त करत रहायचे
मनाच्या समजुतदारपणाचे
पाणी थोडे घालायचे

हळूहळू मग जमेल मस्त भट्टी
मिसळीची चवीशी होईल
छान गट्टी
सुखाशी मग आपली
कायमची बट्टी..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..