नवीन लेखन...

भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील.

पहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला. […]

साहित्यिक पत्रकारिता

मराठी साहित्य परंपरेला पत्रकारितेचा परिसस्पर्श झाला आणि साहित्य सृष्टी सुवर्णकांती प्रमाणे झळाळू लागली. साहित्य वाचकांशी संवाद साधणारं एक प्रमुख साधन. साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांगणातून मुक्त संचार करीत वाचक आणि लेखक परस्परांशी संवाद साधतात. लेखकाच्या भावभावनांना, त्याच्या विचारांना वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारं एक प्रभावी माध्यम म्हणजे साहित्य रचना. […]

निसर्गरम्य अंदमान

अंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग . खरेच आपण तिथे काय आहे ही नीट पाहिले आहे का ? तिथे मला कुठेही फारसे पोलीस दिसले नाही, आणि आश्चर्य म्हणजे एकही स्कूटर किवा बाईक चालवणारा हेल्मेटशिवाय दिसला नाही. तर कोपऱ्यावर चिट्ठी फाडणारा पोलीस किवा घासाघीस करणारा माणूस सापडला नाही. […]

मेरा भारत महान

मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं. […]

कॅाफीपुराण

मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले ! घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफी बनवायची! […]

‘स्व’चा द्वेष करणारे नियोजन

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या लढ्यात स्वदेशीचा विचार प्रेरक होता. पण तो विचार स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढा महत्त्वाचा मानला गेला तेवढाच तो स्वातंत्र्यानंतरच्या नियोजनात त्याज्य आणि तिरस्करणीय ठरवला गेला. त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर तर झालाच पण आपल्या सांस्कृतिक जीवनावरही झाला. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग १ – चिंच

आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय पंधरावा – पुरुषोत्तमयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी पुरुषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय […]

आपटेआजींचा जीभखवळू बटाटावडा 

गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे. […]

दिवाळी आणि रांगोळी…

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]

1 33 34 35 36 37 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..