नवीन लेखन...

निरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…

“वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरींचे” त्यातली ही ओळ “अन्न हे पूर्ण ब्रह्म”.

विद्यालयात असताना वर्गामध्ये काही तास झाले की, मध्यांतर म्हणून मधली सुट्टी व्हायची. एकत्र सर्वजण उभे राहून आम्ही जेवणाआधीचा हा श्लोक म्हणायचो. त्यावेळी इतकच माहित होतं कि ही प्रार्थना म्ह्णुन मग जेवायचे असते. पण खरा अर्थ काय? हे आता कळले.

अन्नामध्ये ब्रह्म ऊर्जा आहे, जी आपलं आरोग्य सकस ठेवण्याच मदत करते. आपल्या देहाला शक्ती मिळवून देते. अन्न ग्रहण करण्याआधी केलेल्या या प्रार्थनेची भावना ही अशी की, “हे देवते, “हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावनेने मी ग्रहण करीत आहे या प्रसादा मधून मला शक्ति व चैतन्य लाभो, हीच आपल्याशी प्रार्थना”.

वदनी कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे ||
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे ||
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रम्ह ||
उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ||

श्री समर्थ रामदासांनी रचलेल्या या सुंदर ओळींचा अर्थ असा की “मुखी अन्न ग्रहण करते वेळी नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..