घराच्या अंगणात चार डिळ्या (खांब)रोवले जायचे त्याच्यावर उभे आडवे लाकडं बांधून त्यावर पळसाच्या पानांचं दाट आवरण असायचं.. या मांडवाखाली एवढं गार वाटायचं की आमचं सगळं कुटुंब पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत तिथेच असायचं.या मांडवावर टाकण्यासाठी पळसाची पानं असायची त्याला आमच्याकडे एक विशिष्ट शब्द होता,त्याला ‘व्हरका’ असं म्हणायचे… […]
काल दुपारी दोनच्या सुमारास झी टीव्ही च्या दोन वेगवेगळ्या चॅनेल्सने अगोचरपणा केला. एकाचवेळी एकाच थीम वर आधारीत दोन चित्रपट सुरु केले. एका चॅनेलवर ” मेहबुबा “- खन्ना आणि हेमा वाला ! […]
रात्रीच्या गप्पांमध्ये खडसे साहेबांनी सांगितले होते की या विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने एक छोटीशी दीड दोन फूट रुंदीची कॉक्रीटची पाय वाट आहे ती थेट वेरुळाच्या कैलास मंदिराच्या माथ्याच्या उंचीपर्यंत जाते आणि तिथून जगातील एकमेव असे ते डोंगरातून खोदून काढलेले परंतु एक स्वतंत्र इमारत आहे असे वाटणारे मंदीर फार छान दिसते. […]
आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे. […]
हा संपूर्ण परिसर म्हणजे एखादे नन्दनवनच आहे. सूर्यास्ताच्या संधीप्रकाशात उजळून जाणारा जलाशय म्हणजे चित्रकाराचे दिवा स्वप्नच आहे असे वाटते.जलाशयाच्या बाजूनी उत्तम बाग, नाना तर्हेच्या फुलांचे, हिरव्यागार झुडपांचे ताटवे ह्यांची लागवड केली आहे. हा नयनरम्य आनंद मनमुराद लुटण्यासाठी छत्तीसगडपर्यटन विभागाने शिशवी रंगात राहण्यासाठी प्रशस्त कॉटेजीस् तयार केली आहेत. […]
पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला. […]
असो. विषय वासाचा आहे. नाकाला सुगंध न येणे हे कानाला संगीत न कळण्या इतकेच दुर्दैवी आहे. आणि हे दोन्ही एका व्यक्तीत एकवटणे म्हणजे दुर्दैव-परमावधीच म्हणायची. सकारात्मकच बोलायचे असेल तर वास न येणे याचेही वेगळे फायदे असतातच. असो. पण विषय (सु)गंधगप्पांचा आहे. मूलतः ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ हा शब्द समुच्चय महा-मृत्युंजय मंत्रातील महेश्वराला उद्देशून असला तरी मोठा मौलिक आणि मानवी मनाला मोहविणारा, जवळचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य – म्हणूनच केवळ हा गंध पुराण-प्रपंच. […]
२७ फेब्रुवारीला दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या ‘पोस्ट’ एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं ‘मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं’ काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. तरच ही ‘अमृताहून गोड’ भाषा टिकून राहील. सकाळी उठलं की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती l करमुले […]
ठरल्याप्रमाणे खानसाहेबांकडून कार्यभार घेतला. त्यांना निरोप दिला आणि आम्ही खुलताबादल जायला तयार झालो. देशपांडेंनी गाडी मागवली. एक जुनाट जीप गाडी आली. […]