साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
आठवणींचे जीर्णोद्धार – “धूप आने दो” (गुलज़ार)
जुन्या,विस्मृत होत चाललेल्या अधाशीपणे मी ती २३४ पाने दिवसभरात वाचून संपविली आणि गेले काही दिवस रवंथ करीत बसलो. २५-२६ लेखांपैकी मला दोनच लेख जिवलग वाटले- एक ” मीनादीदी ” तर दुसरा “साहिर आणि जादू ” ! […]
वो कौन था?
‘मेरा गाव मेरा देश’ चित्रपटाचे वेळी महेश भट्ट, राज खोसलांचे सहदिग्दर्शक होते. या शुटींगच्या दरम्यान विनोद खन्ना व महेश भट्ट यांची जिवलग मैत्री झाली. संजय दत्तच्या पदार्पणातील ‘राॅकी’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना सुनील दत्त यांना नर्गिसच्या उपचारासाठी वारंवार परदेशात जावं लागे. तेव्हा राज खोसला यांनी मैत्रीला जागून, उर्वरित चित्रपट पूर्ण केला. […]
श्री लक्ष्मीनृसिंह संस्थान, वेलींग
लक्ष्मीनृसिंहाच्या गाभाऱ्यात स्नान करून ओल्या वस्त्रानेच जाता येतं. तात्या(वडील) सकाळी लवकर उठून आंघोळ करून तळ्यातल्या पाण्याची कळशी भरून घेऊन गाभाऱ्यात यायचे. गुरुजींचा अभिषेक सुरू असायचा. देवाच्या मूर्तीवर कळशीतल्या पाण्याचा अभिषेक करायचा. पुढे देवाची साग्रसंगीत पूजा व्हायची. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवून फुलांनी सुंदर सजवलं जायचं. गाभाऱ्याबाहेरच्या जागेत बसून पूजेचा सोहळा पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असायचा. […]
आफ्रिकन जमातीचा म्होरक्या आणि खंडणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २५)
मी, येश्या म्हणजे यशवंत आणि काश्या म्हणजे काशीनाथ, आम्ही तेव्हा गडहिंग्लजजवळ होतो आणि आम्हाला एखाद्या मुलाला पळवून खंडणी मागायची कल्पना सुचली. शहरांत लोकांना चीट फंडासारख्या स्कीममधे फसवणं हा आमचा धंदा. तो करायला थोडं भांडवल लागतं. काश्याकडे आणि माझ्याकडे मिळून जेमतेम दहा हजार रूपये होते. आम्हाला आणखी पंधरा-वीस हजार रूपयांची गरज होती. तेव्हा ही मूल पळवण्याची कल्पना […]
सीमाभिंती
या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे. […]
पहिलीपासूनचे सोबती
माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला.. […]
शिक्षित आणि सुशिक्षित
मनात आलं .. हे आपले पद आणि पदव्या मिरवणारे शिकलेले असतील , सावरलेले नव्हेत. इतरांना सावरून घेणे ज्यांना जमते त्यांना सावरलेले म्हणावं. हे प्रचंड शिक्षित असतील पण सुशिक्षित निश्चितच नव्हेत. […]
अनोळखी दिवस
वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती. […]