ललित लेखन
‘इस्त्री’ ची घडी
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी. […]
प्रार्थनांचे सहस्वर !
शालेय कालखंडानंतर प्रार्थना आपल्या आयुष्यातून हद्दपार होते. क्वचित घरात संध्याकाळी ” शुभं करोति ” असे बोबडे बोल उमटतात, एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण प्रार्थना करतो, अध्यात्मिक सत्संगात प्रार्थना भैरवीसारखी असते- ” लोकः समस्ता सुखिनो भवन्तु ” वगैरे! कार्यक्रम संपल्याची ती नांदी असते, पटकन डोळे उघडून दैनंदिनीत शिरायला मोकळे! […]
हां बाबू, ये ‘सर्कस’ है
भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले. […]
मेल – फिमेल व्हर्जन्स !
बासुदांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या पोस्ट्समध्ये लताच्या आवाजातील “रिमझिम गिरे सावन ” नव्याने ऐकलं. मी पाहिलेल्या “मंझिल ” च्या प्रतीत ते समाविष्ट नव्हतं, पण बहुधा या खूप वर्ष रखडलेल्या चित्रपटातील एडिटिंग मध्ये ते उडवलं असण्याची शक्यता आहे. […]
“छत्री धर”
पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या. […]
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३६)
साहित्यिक , विचारवंतांच्या सहवासातूनच योगायोगाने आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेची शाखा मुंबई प्रदेश व ठाणे जिल्हा (महाराष्ट्र्) येथे माझे मित्र कविवर्य प्रा. जयंतराव भावे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झाली. साहित्य हे वैश्विक आहे. साऱ्या जगभरात मराठी भाषिक आहेत. सध्याच्या या फेसबुक / वाट्सअपच्या जमान्यात या वरील मित्रांचा सहज संपर्क संवाद होत आहे. अनेक मराठी लेखक/कवी आपल्याशी जोडले गेले आहेत. […]
डायरीतील विस्कटलेली पाने – भाग पाच
असंख्य डायऱ्यांचा ढीग तिथे होता. नेहमीप्रमाणे विस्कटलेली पाने पडली होती. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पेनं, पेन्सिली, बोरू, टाक, असंख्य रिफिल्स आणि शाईच्या दौती पण पडलेल्या होत्या. बाजूला तराजू मोडून पडला होता आणि हे सगळं एका कचरा कुंडीजवळ पडलं होतं. चमत्कारिक दृश्य दिसत होतं ते. मी सगळ्या डायऱ्या एकत्र केल्या, पानं एकत्र केली आणि वाचू लागलो. […]
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३५)
उत्तम मैत्र हे भाग्याने लाभते ! खरी श्रीमंती तीच असते ! त्या बाबतीत मी भाग्यवंतच. मागील एका भागात मी ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ. द. ता.भोसले या अत्यन्त विद्यार्थीप्रिय अशा आमच्या कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांचा उल्लेख केला आहे. ते सध्या पंढरपूरला स्थायिक आहेत. […]
जान बचीं, लाखों गये
शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच. […]
