नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३५)

उत्तम मैत्र हे भाग्याने लाभते ! खरी श्रीमंती तीच असते ! त्या बाबतीत मी भाग्यवंतच. मागील एका भागात मी ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ. द. ता.भोसले या अत्यन्त विद्यार्थीप्रिय अशा आमच्या कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांचा उल्लेख केला आहे. ते सध्या पंढरपूरला स्थायिक आहेत. […]

जान बचीं, लाखों गये

शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३४)

सातारला प्राचीन तसेच ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, ब्रह्मेन्द्र स्वामी, गोपाळनाथ महाराज त्रिपुटी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतविभूतींची साहित्य ग्रंथ संपदा लाभली आहे आणि तोच अध्यात्मिक साहित्य, कला, संस्कृतीचा देखील प्राचीन वारसा लाभला आहे हे मागील ३३ व्या भागातून प्रत्ययास येते. […]

व्यंकटेश माडगुळकर – हरहुन्नरी लेखक

नवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या  आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग चार

शेतात पडलेली डायरी मला दिसली आणि न राहवून मी ती उचलली. डायरीची रया गेली होती. एकतर ती जुनी वाटत होती, पण पानांवर जागोजाग चिखलाचे, मातीचे डाग दिसत होते. त्यामुळे पानांवरचा मजकूर काहीसा अस्पष्ट झाला होता. ही डायरी कुणी लिहिली होती, ती अशी शेतात कुणी आणून टाकली याचा काही अंदाज लागत नव्हता. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३३)

मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३२)

खरं तर नगरमध्ये बरेच कार्यक्रम झाले त्याचे श्रेय माझे परमस्नेही विद्यमान श्री. सर्वोत्तम क्षीरसागर की जे पुण्यातील आमच्या सप्तर्षी मित्र मंडळ व महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थानच्या अगदी स्थापनेपासून माझ्या सोबतच होते. […]

लावणीची ‘लाट’

‘सांगते ऐका’ चित्रपटातील ‘ बुगडी माझी, सांडली गंऽऽ’ ही लावणी गाजल्यानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. हंसा वाडकर, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक, जयश्री टी, सुषमा शिरोमणी, रंजना अशा अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटातील लावण्यांनी रसिकांना वेड लावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातून संध्या या अभिनेत्रीने सादर केलेल्या लावण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग तीन

डायरी अस्ताव्यस्त होती, पण फार जुनी नव्हती. अतिशय रेखीव, सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या डायरीत, प्रत्येक पानावर एक ओळ आवर्जून लिहिलेली होती. माझ्याच नजरेतून मी उतरत चाललो आहे! डायरी चाळताना प्रत्येक पानावरच्या त्या वाक्याकडे लक्ष जात होतं. मी पानं उलगडू लागलो. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. […]

1 197 198 199 200 201 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..