डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य
कादंबरी :
1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी )
दीर्घकथा संग्रह:
1 रानोमाळ, 2 रानवा
संगीत नाटक :
1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा
गद्य नाटक:
1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल
काव्यसंग्रह:
1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला
ललित लेख: (आगामी)
1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे
कथासंग्रह:(आगामी )
1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा
बाल वाङ्मय:
1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी )
संपादन :
1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा
पारितोषिके:
1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर,
2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक
3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक
उल्लेखनीय :
* पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन
* सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण
* क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण
*आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित
* समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित
* अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन
पुरस्कार
1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार
3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार
6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार
10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार
11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार
12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम
13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार
14 आदर्श शिक्षक पुरस्कार
15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार
16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार....
हा माझा अल्प असा परिचय ...!!!
तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे . […]
मी लिहिलेल्या आठ संगीत नाटकांपैकी तीन नाटकांचे त्रिदल हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . आज त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे . संगीत घन अमृताचा ,संगीत शांतिब्रह्म , संगीत राधामानस या तीन संगीत नाटकांचे , खल्वायन संस्थेने प्रकाशित केलेले माझे पुस्तक म्हणजे त्रिदल […]
जगण्यासाठी , अस्तित्वासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणाऱ्या तरुण पिढीची , मन सुन्न करणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी ही कहाणी . या कथानकाचा शेवट मी सांगणार नाही , तो वाचायलाच हवा , तेव्हाच आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि आपण किती सावध व्हायला हवंय ते कळेल . […]
देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ? […]
प्रत्येक आंदोलन हे राजकीयपक्षाना आपापली किंमत वसूल होई पर्यंत महत्वाचं वाटत असतं. प्रत्येकाची बोली असते.टार्गेट असतं. ते पूर्ण होईपर्यंत आंदोलन ताणलं जातं. गुहागर, लोटेमाळ, जयगड,रत्नागिरी, जैतापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणारा रिफायनरी प्रकल्प…कुठेही जा, प्रत्येक जण आंदोलनाच्या माध्यमातूनओरबाडून खात असतो. […]
कारातीर्थ !!! क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीत जिथं स्थानबद्ध करून ठेवलं होतं, तो तुरुंग म्हणजे कारातीर्थ ! तुम्हा आम्हा सर्वांचे एक श्रध्दास्थान ! स्वातंत्र्यदेवतेचा धगधगता मानवी अवतार रत्नागिरीत जेथे राहून गेला , ती जागा म्हणजे, कारातीर्थ ! इंग्रजांना भाजून काढणारे आणि देशभक्तांना प्रेरणा देणारे विचारांचे अग्निलोळ जिथे अधिक प्रखर झाले ती जागा म्हणजे, कारातीर्थ! विधायक समाजसेवेचा […]
त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी . तिनं इकडे तिकडे पाहिलं . ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती . बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या . आणि सगळे चवीनं खात होते . ” उपमा विकणारा गेला का पुढच्या […]