नवीन लेखन...

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना : भाग २

” राणी लक्ष्मीबाईंचं स्मरण झालं की कृतकृत्य वाटतं .

रणांगणात त्यांनी देह ठेवला .
देह ठेवला असं म्हणायचं , पण प्रत्यक्षात इंग्रजांच्या शस्त्रांनी घायाळ होऊनही , अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करणारा तो विजिगीषू अजरामर आत्मा , क्रुद्ध होऊन या धरेवर त्वेषाने लढला होता .

राणीच्या मनातील अंगार आणि तिचं कर्तृत्व अलौकिक होतं , पण ते कुणाला ठाऊक होतं की नव्हतं असा संभ्रम निर्माण व्हावा असा इतिहास सांगितला जात होता .

माझ्या मनात त्याविषयीचा संताप होता .
खरा इतिहास आणि क्रांतिकारकांचं हौतात्म्य , इतिहासकारांनी जसंच्या तसं मांडायला हवं होतं .पण खऱ्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं की पुढच्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास कळू नये अशीच व्यवस्था केली गेली आहे . खऱ्या खोट्याची भेसळ करून उत्तुंग व्यक्तिरेखांना हिणकस ठरवलं जात आहे . परकीय आक्रमकांना नायक ठरवण्याची घाई झाली आहे .

आपला लिहिला गेलेला इतिहास निर्भेळ नाही . याची तीव्र जाणीव वेदनादायक वाटू लागली आणि मग मलाच आता लेखणी उचलायला हवी , असं वाटू लागलं .

इतिहास काळापासून आपण एक आहोत , भविष्यात सुद्धा आपण एक राहू , ही खरी राष्ट्रीयत्वाची भावना !

पण आत्मभान हरवून जाण्यासाठी , आत्मसन्मान संपविण्यासाठी , न्यूनगंड निर्माण होण्यासाठी , दुही पेरण्यासाठी जाणीवपूर्वक विकृत लिखाण करणाऱ्यांना उत्तर द्यायलाच हवं , असं वाटू लागलं .

परकीय आक्रमकांच्या टाचेखालून राष्ट्रास स्वतंत्र करणाऱ्या , राष्ट्रास पुनरज्जीवित करणाऱ्या विजयशील व्यक्तिमत्त्वांचा इतिहास मांडायलाच हवा होता.
त्यासाठी लेखणी हाती धरायलाच हवी होती .

त्याला समर्पक नावसुद्धा सुचलं .

१८५७ चे स्वातंत्र्यसमर !

त्या युद्धातील एका ज्वलंत समिधेचं नाव होतं , झाशीची राणी लक्ष्मीबाई !

राणी लक्ष्मीबाई म्हणजे अमर्याद आणि उत्तुंग कर्तृत्वाचा महामेरू !
शेवटच्या श्वासापर्यंत रणांगणात तळपत राहणारी रणदुर्गा म्हणजे राणी लक्ष्मीबाई !
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, परवशतेचा शाप मिळालेल्या हिंदुभूमीला आणि जुलूम जबरदस्तीच्या दुःखात बुडालेल्या प्रजेला सावरण्यासाठी, स्वतःवर झालेले आघात, झालेल्या जखमा विसरून, स्वभूमीसाठी आयुष्य पणाला लावणारी धीरोदात्त राणी म्हणजे लक्ष्मीबाई !

अबला असणाऱ्या स्त्रियांचा स्वाभिमान म्हणजे राणी लक्ष्मीबाई !
आपल्या अस्तित्वाने, कार्यकुशलतेने, खंबीरपणाने परिस्थिती हाताळणारी हिंमतवान सेनानी , समृद्ध आणि सुरक्षित राज्य देण्यासाठी सदैव धडपडणारी राणी म्हणजे लक्ष्मीबाई !

सुंदर, सुसंस्कृत,धोरणी,चतुर आणि आपुलकीने , जिव्हाळ्याने सर्वाना आपलंसं करून ठेवणारी गृहिणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई !

हिंदुस्थानच भाग्य म्हणून आदिशक्तीने राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात जन्म घेतला. हिंदुस्थानच परमभाग्य म्हणून राणीनं १८५७च्या स्वातंत्र्यसमरात आणि त्यापुढं झालेल्या संघर्षात अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली . राणी लक्ष्मीबाईंचे ओजस्वी चरित्र, तेजस्वी नेतृत्व, करारी व्यक्तिमत्व , लढाऊ कर्तृत्व, पुढच्या अनेक पिढ्याना नक्की प्रेरणादायक होईल.

हे मला जगासमोर आणायलाच हवं .
त्यासाठी १८५७ च्यापूर्वी झालेलं समरांगण सर्वांसमोर आणायला हवं. सगळा खरा इतिहास हिंदुस्थानवासीयांसमोर मांडायला हवा .
परदेशी आणि एतद्देशियानी लिहिलेला विकृत , त्यांना हवा तसा ,मोडतोड करून लिहिलेला इतिहास , नीटपणे सांगायला हवा .
तो इतिहास दैदिप्यमान आहे , ओजस्वी आहे , प्रेरणादायक आहे आणि क्रांतिकारकांना कार्यप्रवण बनवणारा आहे .मलाच तो इतिहास सांगायला हवा .

हे आदिशक्ती असणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मी माते माझ्या लेखणीत तू अंगार होऊन ये . खड्गाची धार होऊन ये . तुझ्या मनगटातील अतुलनीय धैर्य होऊन ये, तुझ्या मनातील खंबीरता आमच्या हृदयात उतरू दे , परकीय शत्रूवर तुटून पडतानाचा त्वेष , जोश , हिंमत आमच्या व्यक्तिमत्वात भिनू दे. माते , तुझ्यासारख्या अनेक क्रांतिज्वालांचे स्फूर्तिदायक चरितगान गाण्यासाठी माझ्या कंठात आणि लेखणीत अखंडित बळ दे. मला मांडायचा आहे , १८५७ चा रक्तरंजित स्वातंत्र्यसंग्राम ! ज्याला उद्दामपणे अनेकांनी १८५७ चे बंड म्हणून संबोधले . ते बंड नव्हतेच . बंड असते ते स्वकीय सत्ताधीशांच्या विरोधात , पण तुम्ही सर्वांनी केला तो परकीय आणि इंग्रजांच्या जुलमी , अन्याय्य राजवटीविरोधातील स्वातंत्र्य संग्राम ! ते १८५७ चे स्वातंत्र्ययुद्धच होते . मी ते तसेच मांडणार आहे , आणि तुमचा पराक्रम , तुमचे बलिदान पुढच्या पिढ्यांसाठी ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जपून ठेवणार आहे .आजवर होऊन गेलेल्या क्रांतिकारकांनो, तुम्हाला , विनायक दामोदर सावरकर नावाच्या , क्रांतियज्ञातील एका समिधेचे कोटीकोटी प्रणाम !!!

वंदे मातरम !!!
( क्रमशः)

नावासह सर्वत्र पाठवा .

श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी,
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..