मराठे आणि दिल्ली – १८वे शतक – भाग १
अठराव्या शतकात मराठी सत्तेने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भारताचा बराच भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्लीला धडक दिली वा दिल्ली काबीजही केली पण ते दिल्लीपती झाले नाहीत. याचे कारण म्हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्याचा मराठी भाषा, संस्कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्या स्वाभिमानामुळे आणि आपल्या आत्मसंतुष्ट किंवा अल्पसंतुष्ट वृत्तीमुळेच मराठे दिल्लीच्या उंबरठ्यावरच राहिले, दिल्लीपती झाले नाहीत. […]