नवीन लेखन...
ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज

पाकिस्तानात 8 हजार लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक चिनी करोना मृतांचा आकडा 159  पर्यंत गेला आहे.  अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. […]

अफगाणिस्तानात शिखांच्या गुरुद्वारावर आत्मघातकी हल्ला

अफगाणिस्तानमधील शिखांच्या गुरुद्वारावर ३ आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. २५ मार्चला त्यांनी तेथील २०० भाविकांवर गोळीबार केला, बॉम्ब फेकले.  त्यात २५ भाविक मारले गेले. आणि ८० लोकांना त्यांनी ओलिस धरले होते. अफगाणी सुरक्षा दलाच्या सहा तासाच्या चकमकीनंतर  हे तीनही हल्लेखोर ठार झाले. […]

नेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज

भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना  टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. […]

जनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज

चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फ़रक आहे. […]

करोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी

करोना व्हायरसचा भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला,या अभ्यासामध्ये अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावरती विचार करून आवश्यक पावले पण उचलत आहे. […]

देशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…!

भारत सरकारने कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. केंद्र सरकारने या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीर उपाय व जनजागृती युध्द पातळीवर हाती घेतली आहे. सध्या एकतीस मार्चपर्यंत निर्बंध जारी केले आहेत. शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी जारी केली आहे. सर्व गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई म्हणजे गर्दी हे समीकरण आहे. म्हणून गरज नसेल तेव्हा बाहेर पडायचे नाही, हे पथ्य लोकांनी आपणहून पाळणे महत्वाचे आहे. […]

करोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरब आणी रशियामधील सुरू असलेले कच्च्या तेलाचे ‘प्राईस वॉर’ याचा भारताला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात होत आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर असेल. […]

देशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर

भारतिय गृहमंत्रालय सीमा व्यवस्थापन खाते, सीमा व्यवस्थापनासंबंधातील मुद्दे हाताळत असते, पण त्यांचा आवाका प्रभावी व्यवस्थापनाचे दृष्टीने खूपच मर्यादित आणि अपुरा आहे.डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (अंतर्गत सुरक्षा मंत्रालय)सारखे एक सर्व समावेशक मंत्रालय सुरु करुन देश सुरक्षित करावा लागेल. भारत सरकारला अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून, तसेच त्यावरून सुयोग्य धडे घेऊन,अमेरिकन अनुभव भारताच्या परिस्थितीस अनुकूलित करून वापरला पाहिजे. […]

व्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा

सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.राजकीय नेते आणि त्यांचे दौरे यांत पोलीस बळाचा बराच वापर होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेकडे पोलिसांचे अनेकदा दुर्लक्ष होते.त्यामुळे व्हीआयपी सुरक्षेचे महत्व कमी करुन जास्त पोलिस दल सामान्य जनतेच्या सुरक्षेकरता तैनात केले जावे. केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) कवच […]

डोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत

अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो लोकांनी तसेच मोटेरा स्टेडियमच्या आत असलेल्या लाखांवर लोकांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. या भेटीमुळे ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारताला त्याचा खूप फायदा मिळू शकतो. अमेरिकेत थोडेथोडके नाही तर 40 लाख भारतीय आहेत. या अनिवासी भारतीयांच्या मदतीने भारताचे हितसंबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात जपले जाऊ शकतात. […]

1 2 3 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..