नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग पहिला

जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती […]

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ काढण्यासाठी मदत झाली ती ‘मेंसेंजर’ या नासानं बुधाकडे पाठवलेल्या अंतराळयानाची. मेसेंजर यानानं २०११ ते २०१५ या काळात बुधाभोवती प्रदक्षिणा घातल्या. बुधाकडे जाताना या यानानं शुक्राजवळूनही प्रवास केला. आपल्याकडील उपकरणाद्वारे, या दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागापासून विविध अंतरावरून जाताना या यानानं, या ग्रहांपासून येणाऱ्या न्यूट्रॉन कणांची संख्या मोजली व त्यावरून संशोधकांना न्यूट्रॉनच्या सरासरी आयुष्याचं गणित मांडणं शक्य झालं. या गणितानुसार न्यूट्रॉनचं सरासरी आयुष्य हे फक्त तेरा मिनिटांचं असल्याचं आढळून आलं आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

२० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’ […]

सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !

रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे. […]

चित्रकूट एक्सप्रेस: एक प्रयोग

मध्यप्रदेशातील चित्रकूट ही श्रीरामांची कर्मभूमी आणि नानाजी देशमुखांनी राबविलेल्या विविध प्रकल्पांची जागा आहे. ‘विवेक व्यासपीठा’तर्फे ‘चित्रकूट प्रकल्प यात्रे’चं आयोजन करण्यात आलं होतं. कुर्ला टर्मिनस ते चित्रकूट ही यात्रा-स्पेशल गाडी दिमाखात प्लॅटफॉर्मवर उभी होती. १७ डब्यांच्या गाडीच्या प्रत्येक डब्याला नद्यांची नावं देण्यात आली होती. मंदाकिनी, दमणगंगा, कावेरी, गंगा, यमुना, ही नावं झळकत होती व प्रत्येक डब्यावर ऋषितुल्य […]

कविकुलगुरु कालिदास

कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्‍या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.” […]

भारतमातेच्या वीरांगना – 8 : उदा देवी (नेमबाज वीरांगना)

१८५७ चे रणशिंग फुंकले गेले. कमांडर कोलीन कॅम्पबेल च्या नेतृत्वाखाली लखनऊ च्या सिकंदरबाग येथे ब्रिटिशांनी हमला केला. आपल्या तुकडीला योग्य ते मार्गदर्शन करून, ऊदा देवी जवळच्याच एका झाडावर चढल्या आणि तिथून ब्रिटिश सैन्यावर गोळ्या झाडू लागल्या. एकट्या ऊदा देवींनी ३० च्या वर इंग्रजी सैनिकांना मारले. […]

स्वदेशीचे बदलते स्वरूप

शब्दांना अर्थ असतो, पण तो सापेक्ष असतो. कधीकधी तो कालसापेक्षही असतो. कोण कायबोलले आणि केव्हा बोलले याला महत्त्व असतेच… स्वदेशी या कल्पनेचे असेच काहीसे रूप दिसते, मात्र त्याचे प्रकटीकरण वेगवेगळे पाहता येते. स्वदेशी ही कल्पना आधी व्यक्तीला पटावी लागते, मगच त्याची अंमलबजावणी पसरू लागते. त्याचा परिणामही हळूहळू पसरू लागतो. […]

विवेक एक्सप्रेस

भारताचं दक्षिणेकडील अखेरचं टोक म्हणजे कन्याकुमारी. इथेच अरबी व हिंदी महासागर एकत्र येतात. स्वामी विवेकानंद या समुद्राच्या किनाऱ्यावरील एका खडकावर ७२ तास ध्यानस्थ बसले होते. जीवनाचं अंतिम रहस्य त्यांना या जागेवर उलगडलं. स्वामीजींमुळे कन्याकुमारी हे स्थान प्रसिद्धी पावलं. अशा या कन्याकुमारी स्थानकाशी भारताचं अति-पूर्वेकडील शेवटचं स्थानक दिब्रुगड हे विवेक एक्सप्रेस नावाच्या लांब पल्ल्याच्या एकमेव गाडीनं आज […]

‘द्रवरूप’ प्लॅटिनम – नवा उत्प्रेरक

प्रत्येक रासायनिक क्रिया ही वेगवेगळ्या गतीनं घडून येते. काही रासायनिक क्रिया या अल्प कालावधीत घडून येतात, तर काही रासायनिक क्रिया घडून येण्यास दीर्घ कालावधी लागतो. कोणतीही रासायनिक क्रिया उत्पादनासाठी वा अन्य व्यावहारिक कारणांसाठी वापरायची असली, तर ती क्रिया कमी वेळात घडून यायला हवी. रासायनिक क्रियेची गती वाढवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांना उत्प्रेरक […]

1 58 59 60 61 62 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..