भारतात पेट्रोलियम उत्पादने आणि पेट्रोरसायने कोठे बनतात?
भारतातील पहिले तेल शुद्धिकरण केंद्र आसाममध्ये सुरु झाले. त्याला आता १०७ वर्षे झाली.मधे काही वर्षे हे तेल शुद्धिकरण केंद्र बंदही पडले होते. पण परत ते सुरु झाले. या तेल शुद्धिकरण केंद्रातील पदार्थ जनतेच्या मागणीएवढे नसत, त्यामुळे या पदार्थांची फार मोठी आयात करावी लागे. शिवाय एकेका काळाची अशा पदार्थांची गरजही वेगवेगळी .असे.१९०० सालाच्या सुमाराला जेव्हा मोटर गाडया जवळ जवळ नव्हत्या तेव्हा पेट्रोल हा टाकाऊ पदार्थ होता आणि केरोसिनला मोठी मागणी होती कारण ते कंदीलासाठी लागे. […]
