नवीन लेखन...

शैक्षणिक

“पहिला” दिवस शिक्षकाचा !

शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो. […]

दोन सूर्यांचा चमत्कार…… इंटरनेटवरची अफवा (Email Hoax)

गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्‍याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना? […]

एकेरी पालकत्वाचे आव्हान

येणार्‍या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्‍या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का? […]

शिक्षणाचा इतिहास !

नुकताच मी आणि गजा एका व्याख्यानमालेत “ शिक्षण दशा आणि दिशा ” यावर एका शिक्षणसम्राटांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो. मी नेहमीच नवनवीन व्याख्याने ऐकायला जातो . याचे दोन फायदे होतात. एकतर नवनवीन गोष्टी कानावर पडतात . दुसरा फायदा म्हणजे व्याख्यानानंतर असणारी रिफ्रेशमेंट . ही मात्र व्याख्यात्यावर अवलंबुन नसुन प्रायोजकांवर अवलंबुन असते. या गोष्टीचा मात्र माझा बराचसा […]

एका पुतळ्याची ‘कर्म कथा’

१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्‍यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्‍या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली.
[…]

टिप्स नेटभेटीच्या

सध्या इंटरनेटवर ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजचे मोठे प्रस्थ आहे खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी. भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः हजारोंच्या संख्येने रिस्पॉन्स मिळतो. या साईटसवर वावरताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. […]

1 152 153 154 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..