नवीन लेखन...

सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता

There was No TV in those days

1972 चा दुष्काळ आठवतोय,
माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो !
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती !

रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती.
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती !

गॅससाठी नवीन नंबर लावायचा तर दोन तीन वर्षे वेटिंग असायचे, गॅस कनेक्शन साठी सुद्धा पाच पाच तास लाईन मध्ये उभे असायचो आपण,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती.

एवढंच काय, शासकीय दूध योजनेतील दुधाची बाटली घेऊन सकाळीच रांगेत उभे रहायचो, मग तिथली भांडणं, शिवाय त्यासाठीचे कार्ड काढायला ऑफिसमध्ये रांग लावायचो,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती.

सार्वजनिक नळावर रांग, सरकारी दवाखान्यात रांग, कास्ट सर्टिफिकेटसाठी रांग, std बूथ बाहेर रांग, कॉलेजला ऍडमिशन फॉर्म मिळवण्यासाठी रांग…. ही रांगेच्या आठवणींची रांग कितीही लांबू शकेल,
पण हे सर्व होतं तेव्हा ही टीव्ही चॅनेल्स नव्हती,
त्यामुळे देशात खरंच शांतता होती !

आजही, दूरदर्शन सोडून इतर चॅनेल्स एक दिवस बंद ठेवा,
तुम्हाला लक्षात येईल,
देशात खरंच शांतता आहे !

— संजीव सुळे

 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..