नवीन लेखन...

जैत रे जैत 

गो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा. […]

गाण्याच्या कहाण्या – ‘पिया ऐसो जीयामे समाय गयो’

हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता. […]

हिंदी चित्रपटातील  दिपावली गीते…….

चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे. […]

एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”

हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे. […]

जिया बेकरार है……हसरत जयपुरी

बरीच गाणी अशी असतात जी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंताशी जोडली जातात. अंदाज मधील “जिंदगी एक सफर है सुहाना….यहाँ कल क्या हो किसने जाना…” असे हसरत लिहून गेले( या गाण्याने हसरत यानां दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला)  आणि संगीतकार जयकिशन आपली शेवटची चाल बांधून निघून गेले. “जाने कहाँ गए वो दिन….’’ हे त्यांचे गाणे आजही अंगावर काटा उभे करते व राज कपूरचा प्रचंड केविलवाणा चेहरा डोळ्या समोर तरळू लागतो. “झनक झनक तोरी बाजे पायलिया” चे सूर कानी पडताच राजकुमारचा दु:खमग्न चेहरा आठवतो. या गाण्यासाठी हसरत यानां डॉ. आंबेडकर पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड युनिव्हरसिटी राऊंडने त्यानां डॉक्टरेट बहाल केली होती. […]

गाण्यांच्या कहाण्या –‘ नैना बरसे रिमझिम रिमझिम ‘

काल ‘ वह कोन थी ‘ मधल —नैना बरसे ,रिमझिम ,रिमझिम हे गाण ऐकल !क्षणात पन्नास वर्ष ,  मागे ओढला गेलो !आणि –“पिया तोरे आवन कि आस –“हि साद कोणीतरी मलाच घालत असल्याचा भास झाला ! लता मंगेशकरचा आवाज मदन मोहनच्या संगीतात अफलातून बहरतो , याचे हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे . […]

संथ वाहते कृष्णामाई

सहकारी चित्रपट संस्था लिमिटेड सांगली द्वारा प्रस्तुत, अण्णासाहेब कराळे द्वारा निर्मित आणि मधुकर पाठक द्वारा दिग्दर्शित एक नितांत सुंदर मराठी चित्रपट,’ संथ वाहते कृष्णामाई ‘. राजा परांजपे, अरुण सरनाईक, चंद्रकांत, कामिनी कदम, गुलाब मोकाशी, जयमाला काळे, विक्रम गोखले, विनय काळे, बर्ची बहाद्दर यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एका स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावर आधारित होता. […]

मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या ?

मराठी ‘अभिमान’गीत म्हणायचं आणि मग ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ असंही म्हणायचं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी फक्त मूळ कवितेचंच ध्वनिमुद्रण केलं. […]

1 3 4 5 6 7 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..