नवीन लेखन...

अॅ निमिया किंवा रक्त्पांढरीवर घरगुती उपाय

पालक
पालकामध्ये बी-12 हे जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. तसेच फॉलिक अॅ सिडचाही तो मोठा स्रोत आहे. त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास रक्ताोची कमतरता भरून निघते. पालक सूप, पालकाची भाजी यांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

डाळिंब
डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांचे प्रमाण डाळिंबामध्ये खूप जास्त असते. काही प्रमाणात लोह आणि कॅल्शिअम यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण झटपट वाढते आणि रक्त प्रवाहही योग्य राहतो. सकाळी अनशापोटी डाळिंब खाल्ल्यास किंवा डाळिंबाचा रस प्यायल्यास अॅरनिमियामध्ये फायदा होतो.

बीट आणि सफरचंदाचा ज्यूस
बीटामध्ये फॉलिक अॅासिड मोठ्या प्रमाणात असते तर सफरचंदात लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अॅयनिमियामध्ये त्याचा फायदा होतो. अॅलनिमियाच्या रोगात एका बीटाचे रस आणि एक सफरचंदाचा रस यांच्यामध्ये दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्यायलाने फायदा होतो.

टोमॅटो
शरीरातील लोहाचे जास्त प्रमाण गरजेचे असते; पण ते लोह शरीरात शोषले जाणेही महत्त्वाचे आहे. टोमॅटोमुळे लोह शोषले जाते. रोजच्या रोज दोन टोमॅटो खाणे आणि एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस पिणे हितकारक असते. त्याशिवाय सॅलड आणि स्वयंपाकातही टोमॅटोचा वापर अधिक प्रमाणात केला पाहिजे.

खजूर
खजुरामध्ये अधिक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. शंभर ग्रॅम खजुरामध्ये 90 मिलिग्रॅम लोहाचे प्रमाण असते. दुधात दोन खजूर रात्रभर भिजवून सकाळी अनशापोटी चावूनचावून खाऊन आणि दूधही प्यावे. त्याशिवाय खजूर गरम पाण्यात भिजवूनही खाल्ल्यास फायदा होतो. ज्या व्यक्तींाना लॅक्टोजची अलर्जी आहे त्यांच्यासाठी पाण्यात भिजवलेले खजूर हा उत्तम पर्याय आहे.

किसमिस
किसमिसमध्ये लोह, प्रथिने, फायबर आणि सोडियम यांचे अधिक प्रमाण असते त्यामुळे अॅकनिमियामध्ये फायदा होतो. दहा ते बारा किसमिस रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी त्या पाण्यात मध टाकून किसमिस खाऊन टाकावे आणि पाणी पिऊन टाकावे.

मध
लोह आणि बी-12 जीवनसत्त्वाचे प्रमाण मधामध्ये जास्त असते त्यामुळे रोज मध खाल्ल्यास त्याचा नक्कीबच फायदा होतो. फळांचे तुकडे, दूध यांच्यात मध मिसळून खाल्ल्यास अॅचनिमियातील रक्ताातली कमतरता पूर्ण होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. रोहिणी भगत

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..