नवीन लेखन...

कोकण, नारळ आणि कोकम

कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच. […]

मुंबई मेरी जान…

खरं पाहता मुंबई ही काम करणाऱ्याची आईच आहे. कारण मुंबई कधीच कुणाला नाराज करत नाही. देशभरातून लोक इथे येतात आणि पैसे कमावतात. आता तर मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे येथे ग्राहकही खूप आहेत. अगदी 20 – 25 वर्षांपूर्वी जिथे कमी लोकसंख्या होती, तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत. कोरोनाकाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर नोकरी गेल्यामुळे त्रासलेल्या लोकांना नव-रोजगार सुद्धा मिळालेला आहे. […]

कोकणातील देवराया

जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे. […]

कोकण कलावंतांची खाण

कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात. […]

कोकणातील गतकालीन कवी आणि लेखक

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे. […]

कोकणातील समुद्रकिनारा

कोकणातली खूप मंदिरे… सागरकाठावरी! भक्ती गाठते मुक्तीकिनारा, बसून लाटांवरी! कृतज्ञतेचे मीठ सांडते, रात्रंदिन येथे, जाळ्यामध्ये येती धावत, माशांचेच जथे! आकाशाचा रंग पांघरून स्वच्छ निळे पाणी ओठावरती लाटांच्या  तर, फेसांची गाणी! होड्या झुलती दबा धरुनिया, पकडाया मासे, शकुनी मामा होऊनी कोळी, जाळ्यांचे फासे! समुद्र भेटे जिथे नभाला क्षितीजरेषा निळी! सांजसूर्य भेटाया येता, क्षितीज त्याला गिळी! दगडांचा आडोसा […]

कोकणातलो पाऊस

कोकणातलो पाऊस मिरगाचो बांधावर बळी नारळ  कोंब्याचो पेरणीचे दिवस इले शेतकरी कामाक लागले पावस इलो कोपऱ्यात मांगराच्या पत्र्यात, अळवाच्या पानात मनाचो झोपाळो झुललो मातयेच्या वासान, नाच नाचान गेलो म्हातारी आजी, भाजता काजी, आता रूजतली कुरडू भाजी कोपऱ्यात, व्हाळात माझे चढले राजो, सोनो आक्या घेवन धावले बघता बघता सांज झाली, कोकणातल्या पावसाक सुरवात झाली – आर्या सापळे […]

छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम

मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही. […]

लावण्यखणी भूलोकीची!

लावण्यखणी ती भूलोकीची निसर्गसखी कोकण दुहिता रंगबावरी लाजलाजरी इहलोकीची सुंदर कविता! नागमोडी कितीक वळणे खट्याळतेने वाट अडविती पायघड्या अन् घाली सुंदर लाल देखणी कोकणमाती डोंगर माथ्यावरून खाली अल्लड झरे झेपावत येती पदन्यास  ऐकून तयांचा वेडी होते कोकण धरती! समुद्र वैभव कोकणातले भुरळ घाली मना-मनाला पहाटवेळी शांत किनारा देई विसावा जिवाशिवाला! बहर हिरवा झाडे हिरवी पाचूचे हिरवे […]

कोकणचा कुलाचार

कोकणाचा कुलाचार भावे पाळतो वरूण इथे निसर्ग भरतो अन्नपूर्णेचे बोडण सह्याद्रिचे कातळकडे जणू मांडिले चौरंग हिरवट रानवेली, रांगोळीत पुष्परंग शेते-खाचरे रेखीव मांडलेल्या काथवटी त्यात केळीची ग पाने हिरवळीची गोमटी ताडामाडांसह उभे स्वागता आगर सुवासिनींचे चरण धुतो अरबी सागर सुरंगी-अबोलीचे देवीलागी वळेसर आंबे फणस जांभळे नैवेद्याला फलाहार अष्टगंधाचा दरवळ देती बनात केवडे देवीच्या पूजेला नारळ-सुपारी अन् विडे […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..