नवीन लेखन...

कोकणातील मंदिर वारसा

कोकणात मंदिरांबरोबरच विविध देवतांच्या सुट्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत. कदाचित त्यांची इथे पूर्वी मंदिरे असावीत. पण आज ती कुठे दिसत नाहीत. आज मात्र या मूर्ती खास कोकणी पद्धतीच्या साध्यासुध्या कौलारू देवळात ठेवलेल्या दिसतात. कोकण हा जसा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढी-परंपरा आणि विविध मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला प्रदेशही आहे. कोकणातली बरीच मंदिरे अगदी […]

कोकणातील लोक संस्कृती आणि परंपरा

चित्रकथी कलाकार मूळचे महाराष्ट्रातील नसून ते भटकत भटकत महाराष्ट्रात आले. राजाश्रय मिळविण्यासाठी चित्रकथांची निर्मिती झाली. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत, शिवराम राजे यांच्या अश्रयाने ते तिथे कायम स्वरूपी वस्ती करून राहिले आणि हळूहळू ती कला बहरत गेली. बहरलेली ही कला पाहून खूष होऊन राजांनी या कलाकार मंडळींना ठराविक देवळे वतन म्हणून दिली. […]

कोकणी माणसाचे इरसाल नमुने

इथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्‍हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या. […]

कोमसाप एक ध्यास एक प्रवास

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती लवकर पूर्ण होत नाही. भाईंनी कोकणातील कवी, लेखक व रसिकांना जोडण्याचा ध्यास घेतला होता. केवळ तीन महिन्यात सगळी जुळवाजुळव करून 1991 च्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषदेची गुढी उभारली गेली. उत्तर कोकणातून डहाणू, पालघर, केळवे, माहीम, वसई, ठाणे, कल्याण तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्हा यातील साहित्य रसिक कोमसापच्या कल्पनेने भारून गेले. […]

कोकणातील बोली भाषांचे सौदर्य

प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे […]

स्वातंत्र्यसंग्राम : कोकणातील क्रांतिकारक

मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे? […]

प्राचीन कोकणातील बंदरे

व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आर्थिक सुवर्णकाळ म्हणता येईल. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश […]

परशुराम क्षेत्रातले कोकण

वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. त्यांचे नाव परशुराम. […]

कोकणातील बंदरे

दाभोळ, जयगड, रत्नागिरी, रनपार, मुसाकाझी, विजयदुर्ग, देवगड, मालवण अशा सर्वच बंदरातून या प्रवासी आगबोटी येता जाता थांबत होत्या आणि प्रवाशांची बंदरांवर वर्दळही होती. त्याकाळी किनारपट्टीवरील लहान लहान खाड्यांमधून गलबते व मचवे गर्दी करून असत. रेशनवरील तांदूळ, गहु, जोंधळा अशा अन्नधान्यातून मीठ, लाकूड, मंगलोरी कौले अशा सर्व स्तरावरील मालवाहतूक लहान-मोठ्या बंदरांतून गलबतांद्वारे मोठ्या  प्रमाणात होत असे. […]

कोकणची माती आणि तिचे संरक्षण

कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..