
सुचेता कृपलानी यांचा जन्म २५ जून १९०८ रोजी झाला त्या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम करत.
त्यांचा जन्म पंजाबमधील अंबाला (आता हरियाणामध्ये) येथे एका बंगाली ब्राह्मो कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ मजुमदार वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते, अशा नोकरीसाठी अनेक बदल्या कराव्या लागत होत्या. परिणामी,त्यानी अनेक शाळांमध्ये शिक्षण घेतले, त्यांची अंतिम पदवी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात पदव्युत्तर पदवी आहे सुचेता एके ठिकाणी लिहितात की, १० वर्षांची असताना, तिने आणि तिच्या भावंडांनी त्यांचे वडील आणि त्यांचे मित्र जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल बोलताना कसे ऐकले होते. यामुळे त्या इतकया संतापल्या की त्यांनी त्यांच्यासोबत खेळणाऱ्या काही अँग्लो-इंडियन मुलांवर त्यांची नावे घेऊन त्यांचा राग काढला. बनारस हिंदू विद्यापीठात संविधान इतिहासाच्या प्राध्यापिका होण्यापूर्वी त्यानी इंद्रप्रस्थ कॉलेज आणि पंजाब विद्यापीठात शिक्षण घेतले. १९३६ मध्ये, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक प्रमुख व्यक्तिमत्व जे. बी. कृपलानी यांच्याशी लग्न केले, जे त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते.
स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्य
अरुणा असफ अली आणि उषा मेहता यांच्याप्रमाणे, त्या भारत छोडो चळवळीदरम्यान आघाडीवर आल्या आणि ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. नंतर फाळणीच्या दंगलींमध्ये त्यांनी महात्मा गांधींसोबत जवळून काम केले. १९४६ मध्ये त्या त्यांच्यासोबत नोआखाली येथे गेल्या. भारताच्या संविधान सभेत निवडून आलेल्या काही मोजक्या महिलांपैकी त्या एक होत्या. कानपूर मतदारसंघातून त्या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या उपसमितीचा भाग होत्या. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, नेहरूंनी त्यांचे प्रसिद्ध “ट्रिस्ट विथ डेस्टिनी” भाषण देण्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी संविधान सभेच्या स्वातंत्र्य अधिवेशनात वंदे मातरम गायले. त्या १९४० मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या संस्थापक देखील होत्या. स्वातंत्र्यानंतरही त्या राजकारणात सहभागी राहिल्या. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवी दिल्लीतून केएमपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्या त्यांच्या पतीने स्थापन केलेल्या पक्षात सामील झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेस उमेदवार मनमोहिनी सहगल यांचा पराभव केला. पाच वर्षांनंतर, त्या त्याच मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या, पण यावेळी काँग्रेस उमेदवार म्हणून. त्या शेवटच्या वेळी १९६७ मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या.१ डिसेंबर १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.


Leave a Reply