नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

वर्तमानकाळ म्हणजे काय?

जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्‍या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे. […]

समर्थ “समर्थ “का आहेत?

संत हे समाजाचे HR Managers असतात. उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय. मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे. थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे. […]

‘इथे’ ओशाळला’ कोरोना

लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून माणसातील छुप्या ‘सैताना’ने त्याच्या चांगुलपणावर कुरघोडी केली व तो ‘सैतानीवृत्ती’ने वागू लागला…गेल्या दोन महिन्यांत वर्तमानपत्रातील आलेल्या बातम्यांवरुन तयार केलेल्या या पूर्णपणे काल्पनिक पाच अति लघु कथा… […]

माझं “माझं” दुःख !

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]

एकेक दिवा वाटू या !

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे. […]

निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी… […]

संकटकाळात नेतृत्वाची कसोटी !

संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य  होईल. कृतीसाठी सामुहिक  स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो. […]

मानवी मन…एक ऍबस्ट्रॅक्ट ?

खरे तर आपल्याला बुद्धी दिली हा शापच आहे असे आज वाटत आहे. कारण अनुकरण म्हणा एखादा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो की तो मनाच्या पाठीवर भुतासारखा मानगुटीवर बसतोच बसतो. निगेटिव्हिटी किती जोपासावी , त्याला ही खरेच मर्यादा आहेत , आणि पोझीटीव्हीटी किती आणावी यालाही मर्यादा आहेतच. […]

सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच ! […]

परीस…

भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते.” झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. “इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील… प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या […]

1 49 50 51 52 53 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..