नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

जीवनाहून सुंदर

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. […]

नम्रतेमधले स्वहित

इंग्रजीमध्ये एक एक विद्यार्थी विचारतो, आपल्याकडे गोष्ट आहे. धर्मोपदेशकाला पूर्वीच्या काळी अशी माणसे असायची ज्यांना देवाचा चेहरा दिसायचा. सध्याच्या काळी असे का होत नाही? तो उपदेशक म्हणतो, कारण अलीकडे कोणी खाली वाकत नाही, लवत नाही, वाकून पाहात नाही! वाकणे-लवणे हे शब्द नम्रतेसाठी वापरले आहेत. […]

कर्ता आणि ज्ञाता

कुंभार व्हायचे ठरवणाऱ्या माणसाला काहीतरी घडवायचे असते मातीतून. त्याच्या बोटांची आणि मातीची दोस्ती पटकन् जमते. हा त्याचा अंगभूत गुण असतो (संचित. म्हणजेच गुणसूत्रांबरोबर आलेले वैशिष्ट्य). पण हा माणूस उत्तम कुंभाराकडे शिकतो सुद्धा. […]

सुभाषित रत्नांनी – भाग १०

या भागाची सुरवात आपण पहेलिका (कोडे) असणाऱ्या श्लोकांनी करू या. ही लेखमाला इथेच संपूर्ण करू या . ह्या लेखमालेत संस्कृत सुभाषितांचे मराठी भाषान्तर केले आहे. शक्यतो कळण्यास सोपी सुभाषिते निवडायचा प्रयत्न केला आहे. सगळेच श्लोक सगळ्या लोकांना माहित असतील किंवा सर्वच श्लोक प्रसिद्ध असतील असे नाही. परंतु सामान्य लोकांना सोप्या भाषेत सांगावयाचा प्रयत्न केला आहे. […]

राष्ट्रधर्म

मातृभूमीला मातृतुल्य मानले गेले आहे. ज्या देशाचे आपण नागरिक आहोत. ज्या भूमातेने आम्हास जन्म दिला. साधन-सुविधांच्या ‘माणूस’ बनवले ती भूमी खचितच आई आहे. म्हणूनच तर आम्ही आपल्या देशाला भारत माता संबोधतो. माणूस ज्या देशाचा नागरिक असतो तिथेच त्याला प्राथमिक शिक्षण व ज्ञान मिळत असते. […]

मनाची भक्ती

एक माणूस होता, त्याच्या पत्नीने त्याला महामूर्ख ठरविले. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला फार बोचली. त्याला वाईट वाटले आणि त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. प्रौढावस्थेत विद्याध्ययनास सुरुवात केली. दीर्घकाल निरंतर अभ्यास व दृढ निश्चयाच्या बळावर तो संस्कृतचा महाकवी कालिदास झाला. […]

आत्मतत्त्व

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात जीवन जगणाऱ्या माणसाची नाडी ओळखली, प्रगत समाजातील प्रश्न त्यांनी पाहिले आणि विज्ञानाची घोडदौड जाणून घेतली. संत परंपरेचा मूळ धागा न सोडता त्यांनी-‘अध्यात्म और विज्ञान से सब हो सुखी सहयोग समता से यह सृष्टी बने स्वर्गही’ अशी गुरुदेवाला विनम्र प्रार्थना केली. […]

आरोग्यासाठी हास्य

आजकाल खळखळून हसणे आढळत नाही. सभ्यतेच्या कृत्रिम बुरख्यामुळे माणसाची झोप आणि चैन हरवून गेली आहे. स्वतःला अतिव्यस्त केल्यामुळे त्याच्याजवळ कोणत्याही कामासाठी वेळ नाही. चुकून जर कधी वेळ मिळालाच तर ताण-तणाव चिंता-विवंचनेतच तो खर्च होतो. […]

आनंदाचे उगमस्थान

आपल्यापैकी प्रत्येकालाच सुखाची आकांक्षा असते. सुख-साधने सर्वांनाच हवी. असतात, परंतु सर्व सुखसाधने सर्वांनाच कुठे ‘मिळतात? याचे कारण एकच असते ते म्हणजे आनंदाचा उगम कुठे आहे, हेच आपणास ठाऊक नसते. एखादी वस्तू कुठे मिळेल हेच माहीत नसेल तर ती मिळणार तरी कशी? आनंदाच्या शोधात आपण इकडे-तिकडे भटकतो. […]

चार प्रकारचे राम

कबीर साहेबांनी भक्तीसाठी ज्या चार रामाचे मार्गदर्शन केले ते सर्व आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या साधकासाठी पथदर्शकाचे काम करणार आहेत. राम शब्दाला प्रतीकरूप मानून त्यांनी भक्ती करणाऱ्या सर्व साधकांना स्पष्ट इशारा (चेतावणी) दिला आहे की तुम्ही कोणत्या रामाची भक्ती करण्यात मग्न झाले आहात. […]

1 16 17 18 19 20 150
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..