ललित लेखन
कोरोना – मृत्यू वादळ
आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे. […]
वाढदिवसाचं औचित्य अन् शशी खापरे या मित्राची आठवण….
माझ्या खूपशा अप्रकाशित कथानकांचा नायक म्हंटल तर वावगं ठरणार नाही, अशा जीवलग मित्रांवर काही चार पाच टिपण्या कराव्या असं सतत वाटत होतं… पण सतत शैक्षणिक कामाची माझी व्यस्तता अन् त्यात म्हणजे औचित्य सापडंना हे महत्वाचं……….. आपल्या जवळच्या व्यक्तीचं आस्तित्व, त्याची गरज समजण्यासाठी (थोडक्यात चिंतन) थोडेच क्षण असतात त्यामध्ये आत्ता वाढदिवसाची भर पडली….झुकेरबर्ग दादाच्या फेसबुक वर असंच […]
त्रिमोतींची ओटी
एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर. […]
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !
मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते… ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा …. […]
भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं. […]
