भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे. […]
काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला. […]
पहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला. […]
अंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग . खरेच आपण तिथे काय आहे ही नीट पाहिले आहे का ? तिथे मला कुठेही फारसे पोलीस दिसले नाही, आणि आश्चर्य म्हणजे एकही स्कूटर किवा बाईक चालवणारा हेल्मेटशिवाय दिसला नाही. तर कोपऱ्यावर चिट्ठी फाडणारा पोलीस किवा घासाघीस करणारा माणूस सापडला नाही. […]
मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं. […]
मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले ! घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफी बनवायची! […]
आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. […]
गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे. […]
दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]