नवीन लेखन...

शैक्षणिक

मतदान नव्हे मताधिकार

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही. […]

डॉ श्रीकांत जिचकार…. वकिल, डॉक्टर ,आयपीएस, आयएएस +++

एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. […]

संवाद……. कधीही महत्वाचा !

सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. […]

इंग्रजी वाचनाची पायाभरणी

इंग्रजी वाचनाची ओळख इयत्ता ९ वीत असताना सुरवाणी ज्ञान मंदिरात दामलेसरांमुळे (कै. मुकुंद दामलेसर) झाली. सुरवाणीस मुख्यत: पराष्टेकर सर संस्कृत शिकवायचे आणि मुकुंद दामले सर आठवड्यातून तीन दिवस इंग्रजी शिकवायचे. […]

शुभ सकाळ.. उगाच एक morning dose

काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..” […]

बोलीभाषेची कुचेष्टा थांबवा !

घरचं ‘पाणी’ शुद्ध आणि हाॅटेलातल्या ग्लासातलं ‘पानी’ अशुद्ध ? मराठीतला तोंच चणा हिंदीत चना होतो…भैय्या, पान्च्य (पांच नव्हे ना !) रुपये का चना देना)….आगला टेशन थाना (ठाणे नव्हे) .. खाना खानेको गये है.. हे जर आपण चालवून घेतो तर आपल्याच मराठी माणसांचे कांही आपल्याला न पटणारे उच्चार चालवून घ्यायला काय हरकत आहे ? ती त्यांची बोली भाषा असेल तर असूंदे. त्यांची इतकी टवाळी कां करावी ? […]

३ बौद्ध philosophies

‘हंपी’ सिनेमा बघत होते… साधारण अर्ध्या तासानंतर, ललित प्रभाकरच्या तोंडी एक वाक्य आहे… की Buddhist philosophy प्रमाणे जीवनात तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात… […]

असंच असतं ना आयुष्य ?

आयुष्य तर किती एकसारख्या अशा हुलकावण्या आपल्याला देत असतं ना! अगदी आता-आता आपलं सारं सुख, आपला आनंद, किंवा आयुष्याचं मर्म आपल्या जवळ दिसू लागलंय, म्हणेपर्यंत निसर्गाने कूस बदलून घ्यावी, साऱ्या दिशाच विस्कटून, टाकाव्यात, असे काहीसे खेळ चालू असतात त्याचे! […]

‘क’ कावळ्याचा

(लेखक – प्रतीक मिटकरी ) – पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत…. पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का? […]

विमानप्रवासाचे विज्ञान

विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो. […]

1 111 112 113 114 115 167
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..