नवीन लेखन...

चंद्रकोर.. मधुरा उमरीकर यांची कविता

जीवन हा सुख आणि दुःखाचा लपंडाव असतो असं म्हणतात.सुख दुःखाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी कवी किंवा कवयित्रींला लाभलेली असते.आजपर्यंत या चक्रातून कोणीही सुटलेला नाही.प्रत्येकाच्या वाट्याला कमी -अधिक प्रमाणात ते येतच असते म्हणून ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत आणि श्रीकृष्णापासून ते श्रीरामापर्यंत कोणीही या गोष्टीला कमी लेखलेले नाही. […]

बोल मेरे साथिया (ललकार)

१९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं ! […]

लताचे पराभव !

७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय. […]

‘हूरहूर असते तीच उरी’ – मैफिलीचा हा किनारा !

शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “) […]

अरे पुन्हा….. !

हृदयनाथांनी सुरेश भटांची ” उषःकाल होता होता ” ही संगीतबद्ध केलेली गझल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरचा जळजळीत ओरखडा आहे. आणि “अरे पुन्हा ” ची पाळी यावी हेही तितकेच दुर्दैवी नाही का? या गीतामधील लताचे आवाहन मोठे की प्रत्येक ओळीच्या पार्श्वभूमीवरील पडद्यावरचे विषण्ण वास्तव मोठे हे मला ठरविणे अजूनही जमत नाही – फक्त चटके मात्र बसत असतात. […]

‘वो शाम कुछ… ‘

हळवेपण ही भावना साधारण स्त्रियांशी संलग्न असते. पण ठरविले तर एखादा पुरुष उत्कट हळवा होऊ शकतो याचा थरार आणणारा अनुभव किशोर देतो ” वो शाम कुछ अजीब थी ” या ओळींना जिवंत करून ! […]

शेत मजूर

मुळ डच कवि आद्रियान रोनाल्ड होल्स्ट यांच्या या कवितेचा मराठी अनुवाद केलाय विजय नगरकर यांनी. […]

जाहल्या काही चुका…..

एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता ! […]

गीत गाता चल !

आपल्याच धुनमध्ये मस्त असलेल्या, बंधनांना नाकारणाऱ्या श्यामची (सचिनचा तारुण्यातील पहिला चित्रपट ) ही गोड कहाणी ! सोबतीला त्याच्यासारखीच पहिले पदार्पण करणारी (व्हाया  बालकलाकार) सारिका ! १९७५ सालचा हा चित्रपट ! […]

तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानी मुझे दे दो !

१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी ) […]

1 2 3 4 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..