नवीन लेखन...

इच्छापत्र… काळाची गरज

निवृत्तीचे मिळालेले सर्व पैसे आपल्या मुला/ मुलींच्या नावावर केल्यावर पश्चाताप करणारे बरेच वडीलधारी व्यक्तींबाबत आपण वर्तमानपत्र/ चित्रपट/ नातेवाइक/ शेजारी/ प्रवासात भेटणारी व्यक्ती इतकेच नाही तर काही नाटक आणि टीव्ही वरील मालिकांमध्येसुद्धा आपणास पाहण्यात/ वाचण्यात/ ऐकण्यात येतात, त्याचे प्रमुख कारण आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्याची संख्यासुद्धा आपल्याकडे कमी नाही. तरीही प्रत्येक व्यक्तीला असेच वाटत असते की, मला इच्छापत्र/ मृत्युपत्र करण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये इच्छापत्र का/ कोण/ कसे करावे या बाबत माहितीपर लेख आपल्यासाठी. […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग चार

शेतात पडलेली डायरी मला दिसली आणि न राहवून मी ती उचलली. डायरीची रया गेली होती. एकतर ती जुनी वाटत होती, पण पानांवर जागोजाग चिखलाचे, मातीचे डाग दिसत होते. त्यामुळे पानांवरचा मजकूर काहीसा अस्पष्ट झाला होता. ही डायरी कुणी लिहिली होती, ती अशी शेतात कुणी आणून टाकली याचा काही अंदाज लागत नव्हता. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३३)

मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते. […]

राजर्षी शाहू महाराज

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू,  राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते.  छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे  छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या  काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं.  बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. […]

नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व

भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व हे मास्तर कृष्णराव यांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या चढत्या काळात त्यांचं गाणं ऐकून दस्तुरखुद्द बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली व पुढे ते त्याच नावाने जास्त प्रसिद्ध झाले. […]

समुद्राचा अथांगपणा

नेहमीप्रमाणे समुद्रावर गेलो, संध्याकाळची वेळ होती सूर्य डुबत होता…. माझ्या दृष्टीने वातवरण सुन्न होते…. […]

संतसखा

रंगला अभंगी, संतसखा पांडुरंग वाळवंटी वैकुंठीचा राणा पांडुरंग ।।धृ।। आले ज्ञानोबा, आले हो तुकोबा घेऊनी दिंडीसंगे सकल संतजना नाचतो आसमंती , विठ्ठल पांडुरंग ।।१।। बोलती टाळ मृदंग अन दिंड्यापताका वैष्णवांच्या पाऊली, नाचे विठू सावळा मुक्तीच्या सागरी, ब्रह्मरूप पांडुरंग ।।२।। उरले न आता इथे कुठे, द्वैत, अद्वैत एका जनार्दनी, जाहले सारे एकरूप श्वास नि:श्वासाचा धनी, एक पांडुरंग […]

टोयोटा कंपनीचे संस्थापक काईचिरो टोयोटा

काईचिरो टोयोटा म्हणजेच काईचिरो टोयोडा हे जपानमधल्या औद्योगीक क्रांतीचे जनक समजले जातात. त्यांचे महत्वाचे संशोधन म्हणजे ऑटोमेटेड विव्हींग मशिन, ज्याला आपण ‘पॉवर लूम’ म्हणतो यात होते. या मशिनमुळे वस्त्र उद्योगात क्रांती घडवून आणली. नवनवे शोध लावले. त्यांनी वाहन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. […]

प्रख्यात दूरदर्शन निर्मात्या डॉ. किरण चित्रे

डॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या. […]

सवयींचे व्याकरण !

स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही. […]

1 209 210 211 212 213 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..