नवीन लेखन...

टोयोटा कंपनीचे संस्थापक काईचिरो टोयोटा

टोयोटा कंपनीचे संस्थापक काईचिरो टोयोटा यांचा जन्म ११ जून १८९४ रोजी झाला. काईचिरो टोयोटा म्हणजेच काईचिरो टोयोडा हे जपानमधल्या औद्योगीक क्रांतीचे जनक समजले जातात. त्यांचे महत्वाचे संशोधन म्हणजे ऑटोमेटेड विव्हींग मशिन, ज्याला आपण ‘पॉवर लूम’ म्हणतो यात होते. या मशिनमुळे वस्त्र उद्योगात क्रांती घडवून आणली. नवनवे शोध लावले. त्यांनी वाहन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे.

काईचिरो टोयोटा यांनी २८ ऑगस्ट १९३७ साली टोयोटा ह्या कंपनीची सुरुवात केली, त्याशिवाय जपान बाहेर वाहनांचा व्यवसाय नेण्यात काईचिरो यांचे मोठे योगदान आहे. टोयोटाचा लोगो पाहिले असता त्यांच्या लोगोच्या प्रत्येक अक्षरात त्यांच्या आडनावाचे प्रतिबिंब दिसते.

सुरुवातीला टोयोडा असे ह्या लोगोचे नाव ठेवण्यात आले होते. तर नंतर ते बदलून टोयोटा ठेवण्यात आले. ‘डा’ पेक्षा ‘टा’ चा उच्चार लोकांना आवडला म्हणून टोयोटा म्हणायला सुरुवात केली. पण याहूनही महत्वाचे कारण असे होते जपानी भाषेत टोयोटा नाव लिहिताना ८ अक्षरात लिहिले जाते. ८ हा आकडा जपानमध्ये अत्यंत ‘लकी’ समजला जातो. ८ चा आकडा वर्षानुवर्षं प्रगती आणि सातत्य दाखवतो. म्हणून ‘टोयोडा’च्या ऐवजी ‘टोयोटा’ हेच नाव कायम करण्यात आले. केवळ यासाठीच काईचिरो टोयोडा ओळखले जातात असे नाही. त्यांनी औद्योगिक क्षेत्राला नव्या पध्दतीने विचार करायला शिकवले. त्यांची ‘Five whys’ ही संकल्पना आजही उद्योग जगतात ‘लिन मॅनेजमेंट’चा महत्वाचा भाग समजली जाते.

काईचिरो टोयोडा यांचे निधन २७ मार्च १९५२ रोजी झाले.

https://www.youtube.com/watch?v=UPcF34aVUvo

https://www.youtube.com/watch?v=luS3VBrbGZw

https://www.youtube.com/watch?v=3MFjfo2W6FQ

संजीव वेलणकर 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..