नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

निर्गुण्डी – एक चित्तवेधक महाऔषधी

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो […]

कवठ : एक विस्मृतीत गेलेले फळ

कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ४ – पांथस्थांना विसावा देणारा करंज वृक्ष

करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ३ – सोनसळी पिवळा बहावा वृक्ष

बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू, पिवळ्या-सोनेरी रंगाच्या छटांमुळे ‘गोल्डन शॉवर ट्री’ असंही म्हणलं जातं. अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड. […]

वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड

मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे. […]

श्रीनगर – काश्मीर रेल्वे : स्वप्न की सत्य?

काश्मीर भारताशी रेल्वेने जोडलं जाईल हे १२५ वर्षांपूर्वीचे स्वप्न.  या रेल्वेमार्गाच्या बांधणीची पहिली कल्पना १८८९ मध्ये काश्मीर संस्थानातील डोगरा जमातीचे प्रमुख महाराजा प्रतापसिंग यांनी मांडली होती. जम्मू-श्रीनगर रेल्वे प्रकल्पाचं ऑफिस रीआसी या गावात उघडलं होतं. […]

मीच एव्हढा शहाणा कसा – मनोगत

आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. […]

सर्व्हिस मोटार ते लक्झरी

काळाबरोबर जगणं धावपळीचं बनलं होतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. एशियाड सेवेनं शहर जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला… […]

झापगावचा प्राचीन भूपतगड

…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात. […]

1 2 3 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..