नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-ब

आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्‍कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्‍हणजे अशी शंका मांडण्‍यापूर्वी त्‍यांनीं कांहीं गोष्‍टी ध्‍यानांत घ्‍यायला हव्‍या. एक म्‍हणजे भारतातील हवामान. भारतातल्‍या मान्‍सूनच्‍या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्‍ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्‍यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्‍य ऐतिहासिक सत्‍यही येथें लक्षात घ्‍यायला हवें. […]

देशद्रोहासम गुन्हा दाखल करा

जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू. […]

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-अ

भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ? […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३

एक गोष्‍ट आम्‍ही ध्‍यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्‍या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्‍येने त्‍याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. […]

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : प्रास्ताविक

प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.   […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.  आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं. […]

आपल्या हक्काचा दिव्यातील राक्षस

लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो. […]

जीवन आणि यश

मनुष्य स्व इच्छेने जगतो मग इच्छा अनुसार झाले की सुख आणि इच्छा अपूर्ण असल्याचे दुख. फक्त सुख आणि दुख म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जगण्यातील जिवंतपणा आणि तो आज नाहीसा झालेला दिसतो. जे खरे जीवन आहे ते प्रकृतीचे व वास्तवातले आणि खोटे ते कल्पनेतले मग जरा विचार करूया या जीवनामध्ये जगण्या इतके आपले आयुष्य असते तरी किती ? जर साठ वर्ष धरले तर वीस वर्ष झोपण्यात गेले, दहा वर्ष बालपण , दहा वर्ष career साठी, शेवटचे दहा वृद्ध अवस्थेत पश्य ताप करत बसण्यात. राहले दहा, व्यर्थ गोष्टी व मूर्खपणा जाणे केवळ वेळ वाया जातो अशा गोष्टी साठी पाच वर्ष. राहले पाच मग इतकेच असते जे जगायला मिळते हो फक्त इतकेच. मग असे ही एक वेगळं जीवन आहे, ते थोडं भिन्न व नैसर्गिक जे प्रकृती अनुसार असते. […]

1 71 72 73 74 75 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..