“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!” या ओळींचा आज महापूर येणार..आजचा मराठीचा ‘दिन’ केला की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील भूमिका.. मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत […]
रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे […]
चला तर मग यापुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीतच इ-मेल लिहिण्याचा, पत्रव्यवहार करण्याचा आणि फेसबुकवरही मराठीत लिहिण्याचा संकल्प करुया. किमान दहा मेल्सपैकी एक आणि फेसबुकवरच्या दहा पोस्टपैकी एक एवढं तर आपल्या मायबोलीसाठी आपण करु शकतो ना? […]
१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे म्हणतात. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. मोरारजी देसाईंसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नसेल. आज चित्र असं आहे की आपला हा संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिला आहे की नाही याचीच शंका यावी. गेल्या […]
जानेवारी महिना सुरु झाला. आता लवकरंच मराठीचा उत्सव साजरा करणार्यांच्या उत्साहाला भरती येईल. जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध घोषणा सुरु होतील. राजकीय भाषणंही होतील. दरवर्षी हेच चित्र दिसतं, वेगळ्या सजावटीत सजवलेलं. जागतिक मराठी दिन साजरा करताना मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय याकडे आपण कधी बघणार? महाराष्ट्रातील आस्थापनांमधून मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम बनवले […]
यादवकाळात महानुभाव व वारकरी या पंथांनी मराठीचा प्रसार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली. हे कार्य आजही सुरुच आहे. महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींशी संबंधित `लिळाचरित्र (१२३८)’ हे मराठीतील आद्य साहित्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यानंतर संत ज्ञाानेश्वरांनी `भावार्थदीपिका’ अर्थात `श्री ज्ञानेश्वरी’ लिहिली. वारकरी पंथातील संत कवी एकनाथ (१५२८ ते १५९९) यांनी भावार्थ रामायणाद्वारे मराठीतून समाजोपयोगी संदेश दिले. त्यानंतर संत […]
सुमारे पंधरा-सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट.त्यावेळी माझी मुलगी इयत्ता पहिलीत होती.तिला ‘माझी आई’ह्या विषयावर पाच ओळी लिहायला सांगितले होते,व तिने काय लिहायचे हे तिच्या वर्ग-शिक्षिकेने वर्गात फळ्यावरच लिहून दिले होते. फळ्यावरची आई,माझ्या मुलीच्या आई सारखी नव्हती! म्हणून तिने ‘आपल्या आई’ विषयी पाच ओळी लिहिल्या!! वर्ग-शिक्षिकेला अर्थातच राग आला! व फळ्यावरचीच आई सर्वांनी लिहिली पाहिजे असा आग्रह केला. […]
कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल – साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने […]
मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ……..कुणी म्हणतसे …….त्याला खेकडा ………तर कुणी म्हणे ……..हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ……….व्यवहार करताना ……….भावनेला तो मध्येमध्ये आणि ……….फायद्याच्या गोष्टींवर ……….सोडून देई पाणी भावना जेव्हा आड येई तेव्हा पैसा त्याचा जाई पैशाला पैसा खेचतो याची जाण त्याला […]
५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्या विश्व साहित्य संमेलनानिमित्त…… सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला …… मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला ….. मराठीच्या आद्य […]