नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

आहारातील बदल-शाकाहार भाग ११

जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १०

गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते. आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ? “मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ९

रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत. भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही. जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो. चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ८

शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता? भात किंवा भाकरी. प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते. ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो. बाजुला पोळी असते. आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ७

जेवणे म्हणजे शरीराला फक्त कॅलरीज पुरवणे नव्हे. तसं असतं तर शरीराची रोजची गरज किती आहे ती पाहून तेवढीच एक कॅपसुल घेऊन पुरते का ? किंवा एका डब्ब्यातील ड्रींक्समधे भरून ते तेवढेच प्याले तर ? असं चालत नाही किंवा पुरत नाही. जेवण्यातून समाधान मिळत असते. अहो, अगदी घरच्या डब्यातील भाजी पोळी आमटीभात ऑफीसमधे खायचा असेल तर त्याच […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ६

हा खेळ आकड्यांचा पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे. आपण अगदी मुळापर्यंत जाऊ. अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ५

पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो, आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ? आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात, खरं वाटत नाही. पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ? आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय. नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ? कालच्या आरोग्यटीपेवरील […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ४

पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ? पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत. जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ३

आपल्याला चुकुन खूप राग आला तर आपण सहजपणे काय म्हणतो ? “कच्चा चबा के खा जाऊंगा” याचा दुसरा अर्थ असा होतो की, आपल्या भावना बदलल्या की राग येतो. जेव्हा राग येतो तेव्हा भावना तीव्र असतातच, पण त्या आणखीन तीव्र होण्यासाठी कच्चं खाण्याची भाषा केली जाते. याचा अर्थ असा आहे, की कच्चे अन्न खाऊ नये. भावना बदलतात. […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग २

जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ. आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही. बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील […]

1 31 32 33 34 35 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..