नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहार भाग ८

शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता?

भात किंवा भाकरी.
प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते.
ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो.
बाजुला पोळी असते.

आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. ज्वारी बाजरी किंवा मका गहू यापासून बनवलेली रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी हा जेवणातील मुख्य पदार्थ होतो.

रोट म्हणजे हातावर किंवा पाटावर थापून, जाडसर केलेले असतात. तव्यावर एकदा आणि तवा उतरवून पुनः थेट अग्निवर, असे दोन वेळा हे रोट भाजले जातात. आकाराने मोठे ते रोट. आकाराने जरा लहान ती रोटी. रोट, रोटी आणि भाकरी यात आणखी एक फरक आहे तो म्हणजे भाकरीला गरम तव्यावर घातले की लगेच पाणी लावले जाते. रोटीला पाणी पण नाही तवा पण नाही. थेट अग्नीच्या संपर्कात.

अग्निचा संस्कार जेवढा जास्त तेवढा पदार्थ पचायला हलका. हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवावे.

हे रोट भाजताना जर तंदुर वापरली, म्हणजे अग्नि आणि रोट यामधे तव्याचा कोणताही अडथळा न येता हे जाडेभरडे रोट थेट अग्नीवर खमंग भाजले जातात. त्यातील पाणी लवकर सुकवले जाते. ते फुलतात, फुगतात, पापुद्रा वेगळा होतो. आतपर्यंत उष्णता जाते आणि पचायला हलके होतात. पोटही लवकर भरते.

हे तवे पूर्वी खापराचे किंवा मातीचे असायचे. नंतर लोखंडी किंवा बीडाचे म्हणजे मिश्र धातुचे असायचे. आता हिंडालियमचे. हिंडालियम हा पण एक मिश्र धातु. आजचे विज्ञान सांगते, या धातुची झीज लवकर होते. उष्णता मिळाली की त्याला चरे पडतात, त्यातील धातु अन्नातून पोटात जातात. म्हणून त्याचा वापर नियमितपणे जेवणात असेल तर मूतखडा होण्याचे प्रमाण वाढते. किंवा जो विषारी आहे. इंग्रजांच्या काळात बंदीवान कैद्यांना तुरूंगातील भोजन याच अॅल्युमिनीयम वा हिंडालियमच्या ताटल्यातून दिले जायचे. पिक्चरमधे आपण बघतोच.

आज आम्ही ही अॅल्युमिनीयम हिंडालियमची भांडी, स्वस्त वाटतात म्हणून, पटकन स्वच्छ होतात म्हणून, आमच्या घरात वापरायला सुरवात करून, स्वतःलाच स्वतःच्या घरामधे बंदिस्त कैदी बनवून टाकले आहे.
लवकरच सुटका करून घ्यायला हवी ना !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..