पानाची जवळपास अर्धी बाजू या तिखट पदार्थांनी व्यापलेली असते. सुरवात गोड पदार्थांने करावी, नंतर आंबट तिखट. चवी चवीनं जेवावं. पूर्ण आस्वाद घेत जेवावं. एका पदार्थाचा ओघळ दुसऱ्या पदार्थात जावून, दोन्ही पदार्थांचा स्वाद बिघडू नये, यासाठी पानात द्रोण किंवा वाट्या असतात. केळीच्या पानापासून हे द्रोण बनवले जायचे. त्याचा तळ हा डुगडुगणारा असे, किंवा आमटी, भाजी वाढेपर्यंत हाताने […]
रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा ! ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार . जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत. पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात. जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो […]
तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही. भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही. एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात […]
पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात. उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल. फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात […]
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी. ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची ! डाव्या हाताला असणारी चटणी मधे […]
आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ. सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात. आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात. गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील. भारतीय आहारात […]
मिरची तिखट आहे, अन्नाची चव आणि वास दोन्हींना वाढवते. कोलेस्टेरॉललासुद्धा कमी करते. पण अल्सर होण्याची भीती पण वाढते. एकाच वेळी एखाद्या पदार्थाचे गुण पण सांगितले जातात, आणि अवगुण पण. गुण वाचताना वाटते… व्वा. याच्याएवढं चांगलं काहीच नाही, किती चविष्ट आहे ! छान छान !! आणि अवगुण वाचताना वाटतं, याच्याएवढं डेंजर आणि तिख्खट दुसरं काही नाही. (मी […]
तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव. हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव. अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव ! कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, […]
सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात. सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे. सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे. किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते. ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते. […]
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ? आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे. आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते. शिल्लक काय रहाते ? जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते. मागे […]