यहा सब कुछ चलता है ! पंजाबमधे मोदक, केरळमधे डाल बाटी, गुजरातमधे रस्सम, कलकत्याला पुरणपोळी, कसं विचित्र वाटते ना ऐकायला सुद्धा ! पण महाराष्ट्रात, सब कुछ चलता है मक्के की रोटीपासून, सर्व डोसाआयटम, रोसगुल्ला, मख्खनवाला, बिर्याणी, पासून थाई, मेक्सिकन, इटालीयन, चायनीज पर्यंत सर्व पदार्थ घराघरात सुद्धा बनवले जात आहेत. ते एवढे अंगवळणी झाले आहेत, कि ते […]
अस्सल भारतीय बैठकीची पंगत बदलली. जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे. आज सर्व घरांमधे, हाॅटेलप्रमाणेच काटकोनात बसून […]
शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती. संपली ती मजा ! घरचा डबा नेला असला तरी पाणी शाळेतलंच ! मला आठवतंय, पाण्याची बाटली फक्त वार्षिक सहलीच्या वेळी कपाटावरून […]
आहारातील बदल आपण किती मान्य करायचे किती अमान्य करायचे, किती बदलांना अंगवळणी पाडायचे, कितींकडे दुर्लक्ष करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे […]
बदललं, सारंच बदललं. ते गोरे इंग्रज काय येऊन गेले, तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले. आमची सर्व दिनचर्या बदलली, रात्रीचर्या बिघडली, ऋतुचर्या ही बिनसली, आचार बदलला विचार बदलला उच्चार ही बदलला आहार बदलला विहार बदलला जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला. एवढा बदलला कि आपण बदलतोय, बदललोय हे कधी लक्षातही आलेलं नाही. आपल्या […]
आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ? एक. दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर…. दोन अडीज मोसंबी. यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत. आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही ! पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ? एक ग्लास अगदी सहज. आग्रहाने, स्पेशल कोणी आणून […]
चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. “त्याला” फसवून […]
रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात. कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या […]
आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे. जसे लसूण. हिचे संस्कृत नाव […]
तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ? त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल. यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर […]