आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ. सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात. आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात. गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील. भारतीय आहारात […]
मिरची तिखट आहे, अन्नाची चव आणि वास दोन्हींना वाढवते. कोलेस्टेरॉललासुद्धा कमी करते. पण अल्सर होण्याची भीती पण वाढते. एकाच वेळी एखाद्या पदार्थाचे गुण पण सांगितले जातात, आणि अवगुण पण. गुण वाचताना वाटते… व्वा. याच्याएवढं चांगलं काहीच नाही, किती चविष्ट आहे ! छान छान !! आणि अवगुण वाचताना वाटतं, याच्याएवढं डेंजर आणि तिख्खट दुसरं काही नाही. (मी […]
तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव. हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव. अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव ! कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, […]
सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात. सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे. सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे. किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते. ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते. […]
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ? आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे. आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते. शिल्लक काय रहाते ? जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते. मागे […]
लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात. मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे. मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते. कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ […]
जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव ! नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! […]
आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले. बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ? होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना. म्हणजे […]
आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे. पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच. भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत. एकेकाळी भारत हाच […]
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते. म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते. लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही. ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे […]