अकरावा भाग खास विशेष आहे अभ्यास । धरूनी सर्व शास्त्रास नैसर्गिक उपवास ।। बावीस भाग उपासाचे ठरवले कधी जेवायचे । हे कवन फलश्रुतीचे आपणापाशी ।। सुर्यास्ताशी जो जेवेल तो शतायुषी होईल । आनंदे भरील तिन्ही लोक ।। जेवणानंतरचे दोन तास आरोग्याचे असती खास मनी धरूनी ध्यास संकल्प दृढ करावा ।। घड्याळाचे दोन तास पुढे करावे खास […]
नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय. छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो. आम्ही घरीच येतो आठ वाजता घरी येणार कधी ? जेवण बनवणार कधी ? जेवणार कधी ? रात्री उशीराने जेवतो, तसे उशीरानेच झोपतो, ते तसे चालणार नाही का ? एकत्र कुटुंबात शक्यच नाही हो ! आम्ही दोघंही नोकरी करतो, कसं […]
सूर्य नसतो म्हणून…….. दिवस आणि रात्र यांचा, म्हणजेच सूर्य असण्याचा आणि नसण्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आज बघू. फक्त मीच माझ्या मनानेच ठरवून हे नैसर्गिक उपवास सांगतोय असं नाही हो ! आज ससंदर्भच सांगतो. अष्टांगसंग्रह या ग्रंथात सूत्रस्थान अकराव्या अध्यायातील 63 या श्लोकात दोन शब्द आलेले आहेत. तो श्लोक मुळातून देतो, प्रातराशे तु अजीर्णे अपि, […]
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा. अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो. दिवेलागणीची वेळ म्हणजे कातरवेळ. यावेळी जेवू नये असं जुनी माणसं म्हणतात. तेही काही खोटं नाही. अगदी त्या कातरवेळी नाही, त्या आधी जेवलं तरी चालतं. पण […]