नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

भारतमातेच्या वीरांगना – ४३ – राजकुमारी अमृत कौर

पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला. […]

ब्लॅक होल

वैज्ञानिकदृष्ट्या, ब्लॅक होल हा अंतराळातील एक अत्यंत मजबूत गुरुत्वाकर्षणाचा भाग आहे की प्रकाश देखील त्यातून बाहेर पडू शकत नाही. सर्वसाधारणपणे कृष्णविवर म्हणजे अगदी लहान बिंदूमध्ये मोठ्या वस्तुमानाचे संकलन होय. ब्लॅक होलच्या प्रदेशाची सीमा ज्यातून सुटणे शक्य नाही त्याला इव्हेंट होरायझन असे म्हणतात. प्रकाश परावर्तित होत नसल्याने ब्लॅक होलचे निरीक्षण करणे कठीण आहे. गुरुत्वाकर्षण ही सर्वात कमकुवत शक्ती मानली जात असली तरी कृष्णविवरांच्या बाबतीत ती खूप मजबूत असते. जेव्हा खूप मोठे तारे त्यांच्या चक्राच्या शेवटी कोसळतात तेव्हा तारकीय वस्तुमानाचे ब्लॅक होल तयार होणे अपेक्षित असते. बहुसंख्य आकाशगंगांच्या केंद्रांमधून सुपर मॅसिव्ह कृष्णविवर बाहेर पडतात असाही अंदाज आहे. […]

लाल डगलेवाला रेल्वेहमाल

स्टेशनवर शिरतानाच प्रवाशांना जी पहिली व्यक्ती भेटते ती म्हणजे लाल शर्ट व त्यावर पितळी बिल्ला असलेला हमाल. त्यांचं दुसरं नाव आहे ‘कुली’; परंतु ते नाव त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्या संस्थेनं हमालांना ‘पोर्टर’ ते म्हणावं अशी सातत्यानं मागणी केलेली आहे. ‘कुली’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ ‘दिवसभर काबाडकष्ट करणारा कामकरी’ असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाने एक जमात […]

भारतमातेच्या वीरांगना – ४२ – पार्वती गिरी

त्यांनी शाळेला राम राम ठोकला आणि काँग्रेस कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्या खेड्या-पड्यातून प्रवास करायच्या, लोकांमध्ये स्वातंत्र्याच्या भावना जागृत करायच्या. देशाच्या कान्या-कोपऱ्यात कसे हे समर पेट घेते आहे हे सगळ्यांना जीव तोडून सांगत होत्या. स्वदेशी म्हणजेच खादीचा वापर, प्रचार आणि प्रसार केला. गावागावातून चरखा चालविण्याचे, सूत कातण्याचे प्रशिक्षण दिले. आपण गुलामगिरीत जगतोय ह्याची जाणीव जनमानसाला करून द्याययचे काम पार्वती गिरी ह्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी सुरू केलं. […]

नंदराज जटयात्रा – भाग 2

ही यात्रा हरिद्वार-बद्रीनाथ रस्त्यावरील कर्णप्रयागजवळील नौटी या गावापासून सुरू होते. ही यात्रा खडतर आहे. पण निसर्गाचे विलोभनीय दृश्य व गढवाल, कुमाऊँमधील रीतीरिवाज, संस्कृती, लोकगीते, लोककथा या यात्रेत अनुभवायला मिळतात. सरकार तसेच स्थानिक लोक या यात्रेला पूर्ण सहकार्य करतात. ही यात्रा अतिशय पुण्यप्रद समजली जाते. स्थानिक लोक मोठ्या संख्येने तसेच परदेशी पर्यटकसुद्धा या यात्रेत सहभागी होतात. या […]

भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली. […]

बायोकेमिस्ट्रीची सुरुवात

आपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे ! […]

भारतमातेच्या वीरांगना – ४० – अंजलाई अम्मल

१९२१ साली असहकार आंदोलना पासून त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रवास सुरु झाला. दक्षिण भारतातल्या त्या पहिल्या महिला सेनानी ठरल्या. फक्त स्वतः भाग घेऊनच नव्हे तर आपली पारिवारिक भूमी, घर असं सगळं त्यांनी विकून टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी राशी दिली. हे करतांना आपल्या भविष्याच काय? हा प्रश्न या माऊलीला पडला नाही. जे माझे ते देशासाठी अर्पण असाच त्याचा विचार होता. १९२७ साली नीलन ची मूर्ती हटविण्या विरुद्ध त्यांनी लढ्यात सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नऊ वर्षांची मुलगी अम्माकानु ला कारावास भोगावा लागला. […]

रेल्वेमधील फेरीवाले

अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, […]

भारतमातेच्या वीरांगना – ३९ – चंद्रप्रभा शईकियानी

असहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह अश्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी कारावास सुद्धा भोगला. महिलांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवावा ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याच फलस्वरूप ‘आसाम प्रादेशिक महिला समिती’ १९२६ मध्ये स्थापन केली. ज्यामार्फत महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, त्यांच्यासाठी शिक्षण आणि व्यवसाय उपलब्ध करणे, बाल विवाह रोकणे ह्या सगळ्या गोष्टींवर काम सुरू केले. त्यांनी हातमाग आणि हस्तकला ह्याचे महत्व महिलांना पटवून दिले व त्यावर काम करायला प्रवृत्त केले. […]

1 49 50 51 52 53 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..