वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी मदत करणे, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व पत्रकार यांच्यासाठी आदर्श आचारसंहिता निर्माण करणे, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांना अनुरूप असे कर्तव्य वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि पत्रकार जपतील अशी काळजी घेणे, एखाद्या वृत्तपत्रास परदेशातून काही मदत मिळाली असल्यास त्याची तपासणी करणे, व्यवसायातील सर्व संबंधितांचे आपापसांतील संबंध चांगले राखण्यास मदत करणे अशी कामे प्रेस कौन्सिलच्या माध्यमातून केली जातात. […]
पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात ‘जगणं’ सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..! […]
आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात.. […]
भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्या” देशात आज शेतकर्यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी यंदाचा, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला. डॉ.जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. तसेच वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई […]
सध्या व्हाट्सॲपवर आपल्या देशाला India हे संबोधन कसे प्राप्त झाले त्याची निखालस खोटी व कोणताही ऐतिहासीक आधार नसलेली विकृत माहिती देण्यात येत आहे. ती माहिती अशी आहे – “INDIA – Independent Nation Decleared In August असा नामनिर्देश केल्या गेलेल्या हिन्दुस्तानला त्याचा shortform इंग्रजांनी केला INDIA..” खरी माहिती अशी आहे – आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत […]
आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द […]
एकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे काय नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच नाव ब्लॉगला दिले आणि लिहायला सुरुवात गेली…… […]
क्रेडिट कार्डावर पैसे नाहीत किंवा दुसर्या कोणत्या कारणाने तुमचं कार्ड एखाद्या दुकानात रिजेक्ट झालंय? काळजी करु नका. वाईटही वाटून घेउ नका. तुमचंच काय… जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अधयक्षांचंही कार्ड रिजेक्ट होऊ शकतं. किंबहूना झालंय. […]
येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात…. […]