नवीन लेखन...

सत्ता आणि राजकारण :::: सत्तानारायणाची पूजा.

आटपाट नगर होतं. तेथे एक दरिद्री माणूस बायकोमुलांसह रहात होता. खायचे वांधे, ल्यायचे वांधे. अख्खे कुटुंब भिक्षा मागून जगायचे. सकाळी जेवण मिळाले की रात्री जेवण मिळेल याची खात्री नसायची.

एकदा भिक्षा मागता मागता तो दरिद्री माणूस एका बंगल्यापाशी आला. तेथे माणसांची प्रचंड गर्दी होती. झेंडे होते, मोठमोठे फलक होते, मोटारी होत्या, प्रत्येकाच्या हातात नोटांची पुडकी होती, कुणाचातरी जयजयकार चालला होता. भीतभीतच त्याने तेथल्या एका माणसाला विचारले

……साहेब येथे काय चालले आहे? मला भिक्षा मिळेल का?. तो माणूस तुच्छतेने म्हणाला ..अरे भिकारड्या बाजूला हो..दुसऱ्याला विचारले …त्यानेही झिडकारले…तिसऱ्याला मात्र दया आली.. त्याने विचारले .. तू मतदार आहेस का? त्या दरिद्री माणसाने हो म्हटले.. साहेबाचा विचारपालट झाला…

त्या माणसाने त्या दरिद्री माणसाला बंगल्यात नेले.. हातपाय धुवायला गरम पाणी दिले, तोंड पुसायला स्वच्छ टॉवेल दिला, खायला वडापाव दिला, प्यायला चहा दिला. दरिद्री माणसाला एव्हढे आदरातिथ्य जन्मात मिळाले नव्हते.

मग त्या तिसऱ्या माणसाने सांगितले….बाबा, येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात….तू फक्त एव्हढंच करायचं ….मतदान यंत्राचं आमच्या निशाणी समोरचं बटण दाबायचं…

दरिद्री माणूस खुश झाला……तुमच्या निशाणीचंच बटण दाबीन म्हणाला ..

भक्तिभावाने सत्तानारायणाच्या खुर्चीला साष्टांग नमस्कार करून, तो दरिद्री माणूस मनातल्या मनात म्हणाला …सत्तानारायणा, पाच वर्षानंतर मीही तुझी पूजा करीन म्हणतो.. माझ्यावर कृपा कर, भिक्षा मागून मागून माझे कुटुंब फार कंटाळले आहे रे….

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..