“दूरदर्शन वाहिन्यांचा उदय झाला, अन् नवनव्या विषयांच्या मालिकांना सुरुवात झाली. केव्हातरी असं घडतं की, मालिकांची लोकप्रियता असो वा नसो पण त्यांची शीर्षकगीतं ही कमालीची लोकप्रिय किंवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अशाच काही सुमधुर शीर्षक गीतं आणि गाण्यांचा श्रवणीय वेध….” […]
मुंबईत व उपनगरांमध्ये दर दिवशी कुठे ना कुठे बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे, म्हणून मुंबई सात बेटांची असल्यापासून अर्थात त्याकाळी त्याचा आवाका निम्मा असेल पण तो त्या काळानुसार व तिथल्या वस्तीनुसार असायचा आज तर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनेक बाजार भरतात, यामध्ये खाद्यपदार्थांपासून, टाचणी व राई असे सर्व वस्तू उपलब्ध असतात. […]
ज्यावेळी आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रमांचा आपण विचार करतो तेव्हा एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे “वनिता मंडळ” मुंबई केंद्रावरुन अर्ध्या शतकाहून अधिक काळ प्रसारित होणार्या या कार्यक्रमांचं स्वरुप कालपरत्वे बदलत राहिलं, ते फक्त श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच वनिता मंडळ कार्यक्रमाच्या सद्यस्थिती व होणार्या बदलांविषयीचा उहापोह या कार्यक्रमाच्या प्रमुख उमा दिक्षित यांनी मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या खास मुलाखतीत केला.. […]
भारतात अनेक पुरस्कार सोहळे पार पडतात, मग त्यावर अनेक दिवस चर्चा रंगतात, नामांकनं कोणाला मिळाली आहेत, विजेते कोण? वगैरे; पण जर का पुरस्कार किंवा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील असे, तर त्याविषयी अनेकांना आत्मियता वाटते तर अनेकांचा हिरमोड होतो आणि मग थेट पुरस्कार निवड समितीवर आरोपांच्या फैरी झडतात. […]
भारत भेटी नंतर चिनी पंतप्रधान आता पाकिस्तान भेटीवर आहेत.चीनच्या दक्षिण आशियातील परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीन-पाकिस्तानसोबतची अतूट मैत्री भारताने मान्य करावी. केवळ नवी दिल्लीची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधात बाधा येणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे. […]
भारतीय सिनेमाचा जस जसा प्रेक्षक वर्ग दाद देऊ लागला तसा चित्रपटांचा आलेख सर्वार्थाने उंचावत गेला, आणि मग संहिता, आशय-विषय यावर आपसूकच प्रभाव पडला, कारण बदलाचे वारे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, राष्ट्र प्रधान कडून प्रेमाची, भावनिक साद घालणार्या चित्रपटांकडे सरकले. हळुहळू मराठी चित्रपटांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसू लागला. […]
फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पाकिस्तानी मतदारांनी नवाझ शरीफ यांना निवडून दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाक संबंधांचे नवे पर्व सुरू होईल असा भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाही. पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या. एका लोकनियुक्त सरकारकडून दुसर्या लोकनियुक्त सरकारकडे मतपेटीद्वारे झालेले हे देशातील पहिले सत्तांतर आहे. […]
६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी सिनेमाने अगदी दिमाखात विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. यावेळेच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वैशिष्ट्य हे की मानाचे समजले जाणारे आणि प्रत्येक कलाकार, निर्माता तसेच दिग्दर्शकांना किमान एकदा तरी सर्वोत्कृष्ट असल्याचा बहुमान मिळावा असे अनेक पुरस्कार यावेळी मराठी कलाकार आणि चित्रपटाच्या नावे जमा झाले आहेत. […]
मराठी माणसं म्हणजे चौकटीत किंवा साचेबध्द जीवन जगणारा,कधीही जबाबदारीसाठी कचरणारी आणि आपण व आपलं काम बरं यातच धन्यता मानणारा असं सर्वसाधारणपणे अपसमज अनेकांनी आत्तापर्यंत करून घेतला होता. […]
हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला. ‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारताचा सतत द्वेष करणार्या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. […]