रामायण! भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले एक महाकाव्य ! भारतीयांचा एक प्राचीन ग्रंथ ! रामायणाची कथा आपण लहानपणापासून वाचत ,पाहत व ऐकत आलेलो आहोत. बऱ्याच व्यक्तींना ही एक काल्पनिक कथा आहे असे वाटते परंतु आजच्या कलियुगात देखील रामायणाच्या वास्तवतेचे पुरावे दिसून येतात. आजच्या लेखामधे रामायणाच्या वास्तवाची प्रचिती दर्शवणारे हे पुरावे पाहणार आहोत. […]
सुप्रसिद्ध शब्दांकनकार प्रा. नीतिन आरेकर यांनी घेतलेला, वलयांकित व्यक्तींच्या सर्वसामान्यांना माहित असलेल्या व्यक्तिमत्त्वापलिकडे जाऊन घेतलेला शोध….. […]
आजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन. […]
कोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत. परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते. […]
किल्ले राजगडाच्या सगळ्यात उंच असलेल्या (डोंगरावर डोंगर असलेल्या) बालेकिल्ल्यावरून दिसणारं सह्याद्रीचं हे आगळंवेगळं रूप. सह्याद्रीची सगळी राकटता, बुलंदी दर्शवणारं. मराठी मनाला अक्षरशः वेड लावणारं. त्याची छाती अभिमानाने फुलवणारं. त्याचं रक्त-ऊर्जा उफाळून आणणारं. प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा हा अनोखा नजारा बघावा. […]
त्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल. पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय. लॉक डाऊन संपल्यावर … बाप रे ! नकोच तो विचार … […]
नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे. […]
– एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ” आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली . […]
ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]
प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे. […]