नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

१७७६ ची पहिली ब्राम्हण रेजिमेंट

पूर्वापार शास्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हण समाजाने वेळोवेळी शस्त्र धारण करून अतुल क्षात्रतेज दाखविल्याचे हजारो दाखले पुराणकाळापासून आढळतात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा ब्राह्मण – क्षत्रिय अशा जाती नव्हत्याच. एकेका प्रकारचे व्यवसाय, कर्मे, कार्य, जीवन पद्धती जोपासणारे अनेक समूह होते. आज आपण ज्याना जाती म्हणतो अशा कुठल्याही जातीतील कुणीही व्यक्ती, तप ( ज्ञान मिळवून ) करून अत्यंत विद्वान ऋषी – मुनी होत असत. हिंदू धर्मातील हजारो ग्रंथ अशाच ऋषी – मुनींनी लिहिलेले आहेत. यालाच नेमका सुरुंग लावला तो ब्रिटिशांनी ” जातीच्या वाती ” कुशलपणे पेटवून ! […]

गणेशमूर्ती आणि वाढत्या विकृती !

दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली. […]

आडनांवं आणि जात – ही जोडी फोडणं अावश्यक

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं […]

⁠⁠⁠एक कडवट सत्य- “VIP” झाला आहे बाप्पा माझा…!

लालबागमधील गणपती म्हणजे मुंबईची शान. एक काळ असा होता की हा गणेशोत्सव सर्वसामान्यांचा होता. हळुहळू त्याचे VIPकरण कसे झाले त्याबद्दल लिहिलंय एका माजी लालबागकराने. […]

लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव

हल्लीचा जो hot topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली…?? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्या गणपतीला दारात आणून बसवला असे या कृतीचे वर्णन करता येईल. […]

अरेरे, आता पुणेही चालले ! पानिपत,पानशेत आणि आता ?

माझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने – कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर […]

गोव्यातील वेलिंगचा ” लक्ष्मीनरसिंह “

गोव्याच्या  माझ्या मित्राबरोबर त्याचे  कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा. […]

गणपतीसाठी काही खास वस्तू आणि सजावट

आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच ! […]

माटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास

मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]

गणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको !!

गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात. पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत […]

1 39 40 41 42 43 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..