नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

पिठापूर – कुरवपूर : दत्तभक्तांची अविस्मरणीय तीर्थयात्रा

भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान  हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते. […]

दिवाळी अंक आणि मराठी माणूस

मराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील. […]

प्राचीन भारतांतील विमाने

कोणत्याही ज्ञानशाखेचा विषय निघाला की, ही शाखा आमच्या पूर्वजांना पूर्णपणें माहिती होती असें सांगणारे कांही लोक भेटतात. तर काहींचें म्हणणे असें असतें की, भारतांत असणारें ज्ञान है परभृत आहे. भारतीयांनी त्यांत स्वतःची अशी कोणतीहि भर घातली नाही. त्यांनी स्वतः काहीहि नवीन निर्माण केलें नाही. विचारांच्या या दोन्ही टोकांपैकी एकांत भारताच्या अभिनिवेशी अतिगौरवाचा भाग असतो, तर दुसऱ्यांतून न्यूनगंडाने पछाडलेल्या दुबळ्या मनोवृत्तीचें दिग्दर्शन असतें. परंतु कोणत्याहि परिस्थितीचें वास्तव ज्ञान हें प्रगतीला पोषक असतें. या वास्तवज्ञानाचा एक भाग म्हणून आज प्राचीन भारतांत असलेल्या काही विमानांचा परिचय घडविण्याचें ठरविलें आहे. […]

कुतुब मिनार – भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार

तथाकथित मशीद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीच्या बाजूला एक बांधकाम उभे आहे त्याला ‘सराई’ म्हटले जाते. ‘सराई’ हा हिंदी-उर्दू शब्द सोडला तर त्या इमारतीत ‘मुस्लीम’ म्हणण्यासारखे काहीच नाही. ‘सराई’ म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवाशांसाठी बांधलेला निवारा – धर्मशाळा. आपण महाराष्ट्रात त्यांना ‘ओवऱ्या’ म्हणतो. […]

श्री प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर

प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. […]

मंगलाष्टक : वरमाला

यासाठी केला होता अट्टहास असे बिरुद या सोहळ्यास देण्यास हरकत नाही, असा महत्वाचा विवाहसंस्कार लग्नविधी म्हणजे मंगलाष्टक. मंगलाष्टकांशिवाय लग्न लागले हे शास्त्रसंमत होत नाही. आंतरपाटाच्या दोहोबाजूला रुबाबदार नवरा आणि अधोमुखी गौरवर्णा अलंकार पुष्पमंडित सालंकृत नवरी उभे असतात. पौराहित्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या शात्रोक्त मंत्रोच्चाराने नांदी होऊन नातेवाईक देखील एकेक करीत पाच, सात मंगलाष्टकांमधून देवदेवतांना, निसर्ग देवतांना, पवित्र नद्यांना […]

चहाची गाथा

चहा म्हणजे ना, आपला वीक पॉईंट. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहा लागतो असं नाही म्हणता येणार, कारण परदेशातील लोकांप्रमाणे रात्री जेवणानंतर चहा पिण्याची फॅशन अजून तरी आपण स्वीकारलेली नाही. पण चहाचं नाव जरी काढलं ना तरी चहाचा एक तरी घोट पोटात जावा म्हणून आपण धडपडू लागतो आणि तो ग्रहण केल्यावर अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. चहा मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो, नाही का? सकाळी उठल्यावर अंघोळ नाही करता आली तर चालेल, पण चहा पाहिजे. […]

1 2 3 4 5 77
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..