नवीन लेखन...

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

बजेटमध्ये संरक्षण क्षेत्राला काय मिळाले ?

आज भारतीय संरक्षणक्षेत्रापुढे असणारी आव्हाने, शेजारील राष्ट्रांचा धोका, त्यांची युद्धसज्जता, संरक्षणक्षेत्रावर या देशांनी वाढवत नेलेला खर्च, त्यातुलनेने आपल्याकडे असणारी शस्रास्रांची उणीव, मागे पडत गेलेले आधुनिकीकरण, शस्रास्र आयातीवर होणारा प्रचंड खर्च, त्यामुळे वाढत जाणारी आर्थिक तूट ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची गरज होती. मात्र प्रत्यक्षात संरक्षणक्षेत्राच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. […]

भारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी १८-२४ फ़ेब्रुवरीला आले होते. या भेटीत नेपाळच्या पुनर्निर्माणासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अन्य मंत्र्यांशीदेखील चर्चा केली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या या भेटीत भारत आणि नेपाळ दरम्यान सात करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. भारताने पूर्वी आश्‍वासन दिल्यानुसार, १४ जिल्ह्यांत उद्ध्वस्त झालेल्या ५० हजार घरांच्या […]

भारतीय आंतरराष्ट्रीय नौसंचलन २०१६ : ‘महासागरातून एकात्मता’

भारतीय सैन्यदलाचे सरसेनाध्यक्ष या नात्याने राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नौसंचलन आयोजित करण्याचा पायंडा स्वातंत्र्यानंतर पडला. 6 ते 8 फेब्रुवारी 2016 दरम्यान विशाखापट्टणमच्या समुद्रतटावर अशा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौसेना संचलनाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या नौसंचलनांपेक्षा हे अधिक भव्य आणि विराट होते. चीन हिंदी महासागरातील प्रभुत्वासाठी कितीही अटीतटीचे प्रयत्न करो, मलाक्का स्ट्रेटपासून होरमुझपर्यंत हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवणारी भारतीय नौसेना ही […]

इ-पुस्तक – आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे गेली अनेक वर्षे “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर नियमितपणे लेखन करत आहेत. हे लेख अल्पावधीतच आमच्या हजारो वाचकांच्या पसंतीला उतरले असून अतिशय लोकप्रिय झाले आहेत. इ-पुस्तक फक्त रु. १००/- “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा […]

बांगलादेशी घुसखोरी – भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका

१९४४ सालचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेलनी आपल्या ‘व्हॉइसराईज जरनल’ या पुस्तकामध्ये लिहिले होते की “आसामचे मुख्यमंत्री मोहम्मद सदाउल्ला खान हे मोठय़ा प्रमाणात बंगालींची घुसखोरी आसाममध्ये करण्याचा आणि पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत होते”. वायव्य भारतात मुस्लिमबहुसंख्य राज्य असावे ही कल्पना मुस्लिम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी १९३० मध्ये मांडली. जानेवारी १९४० पासून जिना ह्यांनी हिंदू […]

पोलिस-नागरिक समन्वयाची नितान्त गरज

पठाणकोट येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक एकत्र आले होते, त्यावेळचे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. बॉम्बतज्ज्ञ असलेले लेफ्टनंट कर्नल इ. के. निरंजन यांचाही पठाणकोट येथील हल्ल्यात स्फोटके निकामी करताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. राधिका व १८ महिन्यांची मुलगी […]

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होणार

१० डिसेंबरला मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने त्याला माफी देऊन माफीचा साक्षीदार बनविले. मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे […]

आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाय योजना

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे. ‘आयसिस’शी संबंधित ऑनलाइन कारवाया करणाऱ्या भटकळमधील (कर्नाटक) एका ३३ वर्षीय युवकाला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘आयसिस’साठी ऑनलाइन भरती करण्याचे काम तो करीत होता. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे […]

भारत चीन जल युध्द: सद्द्य परिस्थिती आणि उपाय योजना

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्‍या देशातून येणार्‍या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा […]

सैनिकांना विसरू नका…

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या सुमारे सात ते आठ दहशतवाद्यांचा मार्ग रोखून लष्करी जवानांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर झडलेल्या भीषण चकमकीत, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अन्य चार जवान जखमी झाले आहेत. ते मूळचे साताऱ्याचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात १७/११/२०१५ला दहशतवाद्यांसोबत त्यांची […]

1 15 16 17 18 19 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..