नवीन लेखन...

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

पॅरिस हल्ला आणि भारत

फ्रान्स एक सहिष्णूत देश फ्रान्स हा एक आधुनिक विचार सरणीचा, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणारा एक अतिशय सहिष्णूत देश मानला जातो. फ्रान्सची अती सहिष्णूताच या हल्ल्यांकरिता जबाबदार होती का? फ्रान्समध्ये धर्माला महत्त्व दिले जात नाही. तिथे ख्रिश्चानिटी हा सर्वांत मोठा धर्म असला तरीही तिथली चर्चेस सध्या ओसाड पडत चालली आहेत. फ्रान्सचे प्रतिउत्तर वाखाणण्याजोगे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ज्याप्रमाणे फ्रान्सने […]

भारत-जर्मनीतील सहकार्यपर्व एका नविन वळणावर

जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा सहभाग सर्वात मोठा आहे.जर्मनीकडे कारनिर्मिती उद्योग, उद्योगासाठी लागणारे कौशल्य, […]

नेपाळी राज्यकर्त्यांचा भारताकडे कानाडोळा

भारताचा नेपाळच्या नव्या राज्यघटनेचे ‘स्वागत करण्यास’ नकार नवीन राज्यघटनेवरून नेपाळमधील मधेशी समुदायाने उग्र आंदोलन छेडले आहे. गेल्या एक महिन्यापासून आंदोलनादरम्यान झालेल्या धमुश्चक्रीत किमान ४० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे भारत-नेपाळ व्यापार मार्गाची नाकेबंदी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे शेकडो ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. बिरगंज येथील व्यापारी तपास नाक्याचे […]

१९६५ च्या भारत-पाक युद्धाची पन्नाशी

चीनविरोधात १९६२च्या युद्धात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचलेले होते. याच काळात १९६५च्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भारताविरोधात अघोषित युध्द पुकारले. जुनाट शस्त्रसाठा असलेल्या भारतीय सैन्याचा आपल्यापुढे निभाव लागणार नाही, असा विचार करून पाकिस्तानने अत्याधुनिक पॅटन’ रणगाडे आणि सेबर जेट विमान आणि आधुनिक हत्यारांसह भारतीय लष्करावर हल्ला केला. मात्र भारतीय […]

एअर मार्शल पी. एन. प्रधान

भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी.. एअर मार्शल पी. एन. प्रधान हे भारतीय हवाई दलाच्या विविध […]

वन रँक वन पेंशन भावनिक मुद्दा तातडीने काही कारवाई करण्याची गरज

वन रँक वन पेंशनकरिता सध्या माजी सैनिकांकडून देशभर आंदोलने सुरू आहेत. या प्रश्नावर सरकार तातडीने काही कारवाई करेल अशी सैनिकांची अपेक्षा आहे. भारतीय सैन्याकडे नेहमीच आदराने बघितले जाते, पण नागरी सेवेचे नेतृत्व (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) लष्कराला नेहमी दुजाभाव देत असते. नागरी सेवेचे लष्कराशी छुपे युद्ध सुरु असते असे नेहमी म्हटले जाते. वन रँक वन पेंशन याचा […]

सरताज अझीझची धमकी आणि भारताची अणुबॉम्ब क्षेपणास्त्र क्षमता

भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत.भारत – पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्यानंतर हे विधान केले गेले. […]

न संपणार्‍या विवरात पाकिस्तान

आपल्याकडे ‘पेराल ते उगवते अशी एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत लागू पडणारे जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. आजवर भारताविरुद्ध आणि जगाविरुद्धच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानची अवस्था आज दयनीय झाली आहे. तेथे अंतर्गत दहशतवादाने थैमान घातले असून पंजाब या पाकिस्तानचे हृदय समजल्या जाणार्‍या प्रांतात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये तेथील गृहमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक, पेशावरमधील […]

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची समिक्षा

मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या आठवडय़ापासून ज्वालाग्रही रसायनांनी भरलेली पिंपे वाहून […]

पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ?

पाकिस्तानवरील विजयाचे स्मरण देणारा ‘कारगिल विजयदिन’ भारतात साजरा व्हावा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर येथे दहशतवाद्यांनी १२ तास धुमाकूळ घालावा, हा नियोजित हल्ला आहे. गेले काही दिवस ‘बब्बर खालसा’ ही दहशतवादी संघटना हालचाली करीत होती. गुरुदासपूर हा डावीकडे पाकिस्तानची सीमा तर डोक्यावर काश्मीरची देशांतर्गत सीमा असा भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा आहे. सीमा ओलांडून काश्मीरमध्ये घुसणारे […]

1 16 17 18 19 20 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..