Articles by Guest Author
विद्यार्थी संस्कार
आज सकाळी कामावर जाण्यासाठी निघालो पण नेहमीप्रमाने रोजचा रस्ता पावसामुळे बंध झाल्याने कोंगनोळी पांडेगाव खिळेगाव असा निघालो,सकाळी थोडा हलकासा पाउस पण पडत होता. कोंगनोळी च्या पुढे गेल्यावर कच्चा रस्ता लागतो मी तसाच पुढेजात होतो तेव्हा पुढे तीन शाळेची मुले शाळेला जाताना दिसली, रस्ता तर खुपच ओबडधोबड खड्ड्यांचा आहे त्या वर गाडी चालवायचं काय तर सरळ चालायचं […]
नवार्ण मंत्राचा गुढार्थ
माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवार्ण मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. […]
शृंगार मराठीचा
शृंगार मराठीचा नववधू परी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी. प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी, स्वल्पविरामाची नथ भर घाली. काना काना जोडून राणी हार केला, वेलांटीचा पदर शोभे तिला. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल वेणीत माळता पडे भूल उद् गारवाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला उकाराची पैंजण छुमछुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. — WhatsApp वरुन
सुखाची १७ पाऊले
जाग येता पहिल्या प्रहरी हळुवार डोळे उघडावे… १ मग पाहून हातांकडे कुलदेवतेला स्मरावे… २ अंथरुणातून उठताक्षणी धरतीला नमावे… ३ ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे… ४ सर्व आन्हिके झाल्यावर देवाचरणी बसावे… ५ काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे… ६ घरांतून निघता बाहेर आई वडिलांना नमावे… ७ येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे… ८ क्षणभर दाराबाहेर थांबून वास्तूला […]
समाधान बाजारात विकत मिळत नाही
एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि […]
तयारी एन.डी.ए ची !
देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. […]
MPSC च्या वाटेवर चालताना….
दैनंदिन जीवनात वावरताना खूप बदल घडवून आणलाय MPSC ने माझ्यात … मला कोणी विचारलं की तू एका वर्षात ठोस काय मिळवलं रे… त्याच उत्तर “शून्य” असू शकतं … पण मी काय मिळवलं ते मला माहितेय… कारण मला “दृष्टीकोन ” मिळालाय!! खूप up n downs येतात … कधी कधी चिडायला होतं तर कधी रडायला पण येतं… पण तेवढ्या पुरतं … कारण तेपण शिकवते की MPSC …!!! […]
एक कडवट सत्य- “VIP” झाला आहे बाप्पा माझा…!
लालबागमधील गणपती म्हणजे मुंबईची शान. एक काळ असा होता की हा गणेशोत्सव सर्वसामान्यांचा होता. हळुहळू त्याचे VIPकरण कसे झाले त्याबद्दल लिहिलंय एका माजी लालबागकराने. […]
एक फाशी
नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा ••••••••••••••••••••••••••• एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख. ……………………………………………….. एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती. पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली “गर्दी”, का […]